IND vs ENG T20I 2021: ‘विराट कोहलीसाठीही हा नियम लागू पडतो का?’ Rohit Sharma याला विश्रांती देण्याच्या निर्णयावर Virender Sehwag ने उपस्थित केला प्रश्न
वीरेंद्र सेहवाग (Photo Credit: PTI, Instagram)

IND vs ENG T20I 2021: पहिल्या टी-20 च्या नाणेफेक दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सामन्यासाठी आपली इलेव्हन उघडकीस आणली तेव्हा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीमुळे अनेक चाहते आणि तज्ज्ञांना धक्का बसला कारण 24 तासांपेक्षा कमी काळापूर्वी स्वत: कोहलीने मालिकापूर्व पत्रकार परिषदेत शर्मा आणि केएल राहुलसह सलामीला येतील असे स्पष्ट केले होते. तरीही रोहितला पहिल्या काही टी-20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्याचे भारतीय कर्णधार म्हणाला. टी-20 संघाच्या उपकर्णधाराला विश्रांती देण्याचा निर्णय फारसा चांगला झाला नाही, विशेषत: पहिल्या सामन्यात टॉप ऑर्डर पूर्णतः अपयशी ठरला. माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी टीम इंडियाच्या कॉल निर्णयावर जोरदार टीका केली. (IND vs ENG 2nd T20I 2021: दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असू शकते भारताची Playing XI, पहा कोण-कोणत्या खेळाडूला मिळू शकते स्थान)

क्रिकबझ लाईव्ह शोमध्ये बोलताना सेहवाग म्हणाला, “असं म्हटलं जात होतं की रोहित शर्मा दोन सामन्यांमध्ये ब्रेक घेईल, पण विराट कोहलीलाही हा नियम लागू पडतो का. कर्णधार म्हणून तो येऊन असे म्हणत नाही की पुढच्या दोन किंवा तीन सामन्यांसाठी मी ब्रेक घेईन असे मला वाटते. मला आठवत नाही की कर्णधार कोहलीने स्वतःहून ब्रेक घेतला होता. कर्णधार ब्रेक घेत नसल्यास तो इतरांना ब्रेक कसा देईल? हे खेळाडूवर अवलंबून असले पाहिजे,” सेहवाग शोवर म्हणाला. कसोटी मालिकेत रोहित शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. “जर रोहितने चार कसोटी सामने खेळले असतील आणि चांगली कामगिरी केली असेल आणि तो फॉर्मात असेल तर, तो पुन्हा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये परतण्याची आणि तो फॉर्म हस्तांतरित करण्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असेल. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वत: ला अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, म्हणून जेव्हा व्हाईट बॉल येतो तेव्हा खेळाडू सामान्यपणे विचार करतात की ‘जेव्हा मी मुक्तपणे फलंदाजी करू शकलो, चौकार आणि षटकार मारून स्वतःचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतो’,” सेहवागने पुढे म्हटले.

रोहित पुन्हा संघात आला तर कोहली आपल्या वाट्यातील विश्रांती घेईल काय? असा प्रश्नही विराटने उपस्थित केला. “तर रोहित पुनरागमन करून खेळला तर विराट कोहली स्वत:ला विश्रांती देईल का? जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते तेव्हा तुम्ही (कोहली) रोहित, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहला ब्रेक देता, पण तुम्हाला ते लागू होत नाही?”