अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी; तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र
वाटेगाव येथे साठे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी तेलंगणा सरकार केंद्राला पत्र लिहिणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी प्रसिद्ध मराठी कवी आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याबाबत भाष्य केले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे साठे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी तेलंगणा सरकार केंद्राला पत्र लिहिणार आहे. अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेदेखील केंद्राला पत्र लिहावे असे केसीआर म्हणाले. केसीआर आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. (हेही वाचा: Sharad Pawar On Surgical Strike: देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार)
Telangana CM KCR urges Modi government to confer Bharat Ratna to Tukaram Bhaurao Sathe, popularly known as Anna Bhau Sathe who was a social reformer, folk poet, and writer from Maharashtra
TS govt to write to Centre and KCR also asks Maharashtra govt also to demand Bharat Ratna… pic.twitter.com/SjohbPnr72
— Naveena (@TheNaveena) August 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2023 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

