नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मोरबे मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी ब्रीजजवळ रेल्वे ट्रॅकलगत व चिखले गावाजवळील ब्रीजखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असल्याने आता दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये बुधवार, दि.14 मे 2025 रोजी संध्याकाळी आणि गुरुवार, दि. 15 मे 2025 रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवी मुंबई मध्ये 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा
पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन
मोरबे मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी ब्रीजजवळ रेल्वे ट्रॅकलगत व चिखले गावाजवळील ब्रीजखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असल्याने, सदर ठिकाणची जलवाहिनी बदलण्याच्या दुसऱ्या टप्यातील काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवार दि.14 मे 2025 रोजी हाती… pic.twitter.com/ewyD37pqSg
— Navi Mumbai Municipal Corporation (@NMMConline) May 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)