NMMC Revokes Water Cuts: धरणाची पातळी वाढल्याने नवी मुंबईमधील पाणी कपात रद्द; येत्या 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू
सुरुवातीला, जूनमध्ये कमी पाऊस आणि कमी होणारा साठा यामुळे पाणीकपात लागू करण्यात आली होती. जूनच्या मध्यापर्यंत धरणाची क्षमता केवळ 26% होती.
NMMC Revokes Water Cuts: नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सततच्या पावसामुळे धरणाची पातळी पूर्ण क्षमतेच्या जवळपास 74% पर्यंत वाढल्यामुळे आता पाणी कपात होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे. येत्या 29 जुलै पासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू होणार आहे. मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 2400 मिमी पाऊस झाला. पाणीपुरवठ्यावर मर्यादा घालणे आता आवश्यक नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुरुवातीला, जूनमध्ये कमी पाऊस आणि कमी होणारा साठा यामुळे पाणीकपात लागू करण्यात आली होती. जूनच्या मध्यापर्यंत धरणाची क्षमता केवळ 26% होती. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीकपात झाली, ती वाढून आठवड्यातून दोनदा झाली. आता मोरबे धरण 88 मीटरने ओव्हरफ्लो झाले आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2024: गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; 15 ऑगस्टपासून सुरु होणार वाटप)
पहा पोस्ट-
नवी मुंबई मधील पाणी कपात रद्द
29 जुलै पासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू#nmmc #DrKailasShinde #navimumbaicity@NMMCCommr @NMMConline @NaviMumbaikars @NaviMumbaiCity @DrKailashshinde https://t.co/6fK0lxDWNA
— Nave Shahar (@NaveShahar) July 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 12:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

