Mumbai Water Cut To End: तलावांमधील पाणीसाठा 80 टक्क्यांवर; BMC मागे घेणार मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात

सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे.

Mumbai Water Cut To End: तलावांमधील पाणीसाठा 80 टक्क्यांवर; BMC मागे घेणार मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात
Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

मुंबईमध्ये महापालिकेने 1 जुलै पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने ही पाणी कपात लागू होती. मात्र आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सात तलावांमधील पाणीसाठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 80% इतका वाढला आहे. सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे. माहितीनुसार, उद्या म्हणजेच 9 ऑगस्ट 2023 पासून ही पाणीकपात मागे घेतली जाणार आहे.

(हेही वाचा: Pune Water Supply News: पुण्यात गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे, नागरिकांना दिलासा)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2023 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).