Mumbai Water Cut To End: तलावांमधील पाणीसाठा 80 टक्क्यांवर; BMC मागे घेणार मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात
सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे.
मुंबईमध्ये महापालिकेने 1 जुलै पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने ही पाणी कपात लागू होती. मात्र आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सात तलावांमधील पाणीसाठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 80% इतका वाढला आहे. सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे. माहितीनुसार, उद्या म्हणजेच 9 ऑगस्ट 2023 पासून ही पाणीकपात मागे घेतली जाणार आहे.
(हेही वाचा: Pune Water Supply News: पुण्यात गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे, नागरिकांना दिलासा)
The @mybmc will withdraw the 10% water cut which has been imposed over Mumbaikars since July 1 this year in wake of water stocks in lakes now having touched 80%.
— Richa Pinto (@richapintoi) August 8, 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठ्यात लागू केलेली, १० टक्के पाणी कपात ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे. @mybmc #water pic.twitter.com/2O4e0VJZrE
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2023 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

