Unseasonal Rain In Maharashtra: अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात; CM Eknath Shinde पाहणीसाठी आज नाशकात शेतकर्यांच्या बांधावर!
नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सटाणा, देवळा, नांदगाव, सिन्नर मध्ये गारपीटीने नुकसान झालं आहे.
महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यामध्ये झालं आहे. सुमारे 28 हजार हेक्टर मध्ये शेतीचं नुकसान झालं आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये काही गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला आहे. नक्की वाचा: Maharashtra CM Eknath Shinde महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि कृषी संकटावर उपाययोजना आणि भरपाई देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह घेणार आज बैठक.
पहा ट्वीट
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी बागलाण तालुक्यातील (जि.नाशिक) निताने, बिजोटे, आखटवाडे या शिवारात गारपीट व वादळामुळे नुकसान झालेल्या कांदा, पपई, डाळिंब यासह इतर पिके-फळबागांची पाहणी केली. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री @dadajibhuse होते. pic.twitter.com/ZkKkwvCRr0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2023 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

