Maharashtra Onion Crisis: नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंदी मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावी; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे आवाहन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री गोयल व उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे 29 सप्टेंबरला बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. दिल्ली येथील बैठकीस राज्य मंत्रिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहक वर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह उपस्थित मंत्रिमहोदयांनी केले. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री गोयल व उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (हेही वाचा: Raj Thackeray On Marathi Boards: दुकानांवर मराठी पाट्या, कोर्टाचा निकाल, अन् राज ठाकरे यांना आनंद; व्यक्त केल्या भावना, वाचा सविस्तर)
नाशिक जिल्ह्यातील #कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री @PiyushGoyal व उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. pic.twitter.com/gA0YnOdFd1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2023
#कांदा उत्पादक शेतकरी,व्यापाऱ्यांसह ग्राहकवर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न असून नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घ्यावा,असे आवाहन केंद्रीय मंत्री @PiyushGoyal, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह उपस्थित मंत्रिमहोदयांनी केले pic.twitter.com/IdqAG3xE6m
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

