Loudspeaker Row in Maharashtra: 'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका' Raj Thackeray यांचं मनसे कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना पत्र
मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आक्रमक झालेल्या मनसेला रोखण्यासाठी सध्या मनसैनिकांची दडपणूक केली जात असल्याचं राज ठाकरेंनी पत्रात लिहलं आहे.
मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आक्रमक झालेल्या मनसेला राज्य सरकारने रोखलं आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मनसैनिकांवर तडीपारीच्या नोटिसा आहेत. अनेकांची मागील 8 दिवसांपासून धरपकड सुरू आहे. यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. यामध्ये 'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका' सत्ता येत-जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंंचं पत्र
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP
— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2022 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

