Terror Attacks in India: भारतात दहशतवादी हल्ल्यांची योजना; UP ATS द्वारे दोन पाकिस्तानी नागरिकांसह तिघांना अटक

काही पाकिस्तानी नागरिक आयएसआयच्या मदतीने नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती यूपी एटीएसला मिळाली होती, ज्यावर एटीएस फील्ड युनिट गोरखपूरने पाळत ठेवून या तिघांना अटक केली.

Terror Attacks in India: भारतात दहशतवादी हल्ल्यांची योजना; UP ATS द्वारे दोन पाकिस्तानी नागरिकांसह तिघांना अटक
Arrest | (Representative Image)

Terror Attacks in India: नेपाळ-भारताच्या सोनौली सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना यूपी एटीएसने अटक केली आहे. त्यापैकी दोन पाकिस्तानचे नागरिक आहेत तर एक काश्मीरचा आहे. काही पाकिस्तानी नागरिक आयएसआयच्या मदतीने नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती यूपी एटीएसला मिळाली होती, ज्यावर एटीएस फील्ड युनिट गोरखपूरने पाळत ठेवून या तिघांना अटक केली. या सर्वांनी भारतात दहशतवादी घटना घडवण्याची योजना आखली होती. त्यांनी आयएसआयच्या मदतीने हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षणही घेतले आहे. सय्यद गझनफर, मोहम्मद अल्ताफ बट आणि नासिर अली अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. अल्ताफने सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय काश्मीरस्थित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या सहकार्याने भारतात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने भारतीय लोकांची भरती करत आहे. (हेही वाचा: Rajastan Murder Video: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा, थरारक घटना CCTV कैद)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 07:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).