Water Cut In Mumbai: 24 ते 27 मे दरम्यान मुंबईत पाणीकपात, 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार मोठा परिणाम
24 मे ते 27 मे या कालावधीत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार, 24 मे ते 27 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 टक्के पाणीकपात केली जाईल.
महाराष्ट्रातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर झाले आहे. नागपुरात लोक पिण्याच्या पाण्यासाठी आसुसले आहेत. त्याचबरोबर मुंबईतही पाणीकपातीची तयारी सुरू आहे. वास्तविक बीएमसीने पाणीकपातीची माहिती दिली आहे. 24 मे ते 27 मे या कालावधीत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार, 24 मे ते 27 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 टक्के पाणीकपात केली जाईल. बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित भागातील नागरिकांनी वर नमूद केलेल्या कालावधीत पाणी कपातीच्या एक दिवस अगोदर आवश्यक पाण्याचा साठा ठेवावा असे आवाहन आहे. हेही वाचा Maharashtra Weather Update: अरबी समुद्रात मोसमी पाऊस दाखल; महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू
विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर यांसारख्या पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून बीएमसीने आधीच कळवले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2022 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

