थकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोडणी कापण्यात येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
लॉकडाऊन काळात जास्त बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
लॉकडाऊन (Lockdown) काळात जास्त बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तसेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी नितीन राऊत बोलत होते. सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश राऊत यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. याशिवाय ग्राहकांना विजेचे बिल कशाप्रकारे देण्यात आले याबाबतची माहिती देण्याबाबतचे निर्देशही राऊत यांनी सर्व वीज पुरवठाधारक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. (हेही वाचा - Building Wall Collapses In Mumbai's Grant Road: मुंबईतील ग्रँट रोड येथील पाववाला स्ट्रीट भागात इमारतीचा भाग कोसळला; 2 जण जखमी)
लॉकडाऊन कालावधीत आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही.https://t.co/F0aIIdHhPh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 15, 2020
विजबिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे. कोणाही ग्राहकाला चुकीचे बिल भरायला लागू नये, याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी. तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाहीची यंत्रणा निर्माण करावी आदी सूचना राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केल्या.
(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2020 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

