Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल; Nitin Gadkari यांची माहिती

गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील कोकणातील 66 पर्यटन स्थळांना स्पर्श केला आहे. त्यामुळे इथल्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक करणे शक्य होईल.

Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल; Nitin Gadkari यांची माहिती
Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa National Highway) काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पनवेलमध्ये सांगितले. पळस्पे-इंदुपूर राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य दोन मार्गांच्या काँक्रिटीकरणाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण परिसराच्या विकासाच्या शक्यतांना चालना मिळेल. यावेळी ते 63.9 किमी लांबीच्या 414.68 कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांच्या भूमिपूजनाला ते उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील कोकणातील 66 पर्यटन स्थळांना स्पर्श केला आहे. त्यामुळे इथल्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक करणे शक्य होईल. महामार्ग पूर्ण होण्यास उशीर झाल्याबद्दल गडकरींनी 2011 मध्ये ज्या कंत्राटदारांना बांधकामासाठी दोन पट्टे देण्यात आले होते त्यांना जबाबदार धरले. आता हा महामार्ग 11 टप्प्यांत बांधला जात आहे आणि त्याचे रुंदीकरण केले जात आहे.

ते पुढे म्हणाले की, भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब आणि वनजमीन मंजूरी यासारख्या मुद्द्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामे रखडली असून बांधकाम पूर्ण होण्यास विलंब झाला. मात्र, या समस्यांचे निराकरण करण्यात आले असून, आता काम सुरू आहे. या प्रसंगी, त्यांनी 13,000 कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई आणि दिल्ली दरम्यानचे अंतर 12 तासांपर्यंत कमी करेल. याशिवाय, 1,200 कोटींच्या कळंबोली जंक्शन आणि 1146 पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल. (हेही वाचा: Konkan Railway Summer 2023 Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणार्‍यांसाठी विशेष ट्रेन्स; पहा यादी)

गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशभरातून एका वर्षात सुमारे 5 लाख रस्ते अपघात नोंदवले जातात त्यापैकी 1.5 लाख प्राणघातक आहेत. मृतांपैकी बरेच जण 18-34 वयोगटातील आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2023 10:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).