Maharashtra New Corona Guidelines: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आजपासून कडक निर्बंध लागू; काय सुरू, काय बंद राहणार जाणून घ्या
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

Maharashtra New Corona Guidelines: राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता रविवारी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. तसेच, सोमवारपासून 30 एप्रिल दरम्यान नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. याशिवाय कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी खाजगी कार्यालये, थिएटर आणि सलून इत्यादी बंद करणे यासारख्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त, आठवड्याच्या सर्व दिवस कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी केली जाईल.

या निवेदनात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा, मेडिकल स्टोअर आणि किराणा दुकानांशिवाय इतर सर्व दुकाने, बाजारपेठ आणि शॉपिंग मॉल्स 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. हे सर्व नवीन निर्बंध सोमवारी रात्री 8 वाजेपासून लागू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत या सर्व निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वाचा - Maharashtra: विकेंड लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार? चंद्रकांत पाटील यांचा सवाल)

बँकिंग, शेअर बाजार आणि विमा कार्यालयांवर निर्बंध लागू नाहीत

बँकिंग, स्टॉक मार्केट, विमा, औषध, दूरसंचार आणि मेडिक्लेम क्षेत्र वगळता सर्व खासगी कार्यालये या निर्बंधांनुसार बंद राहतील. खासगी कार्यालयांना घरातून कामे राबवणे बंधनकारक आहे. तथापि, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज विभाग आणि पाणीपुरवठा संबंधित कार्यालयांना निर्बंधातून सूट देण्यात येईल.

सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती काम करण्याची परवानगी

कोविड व्यवस्थापन विभाग वगळता सर्व सरकारी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेवर काम करण्याची मुभा दिली जाईल. तसेच, अभ्यागतांना सरकारी कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. तथापि, अत्यावश्यक सेवांना रात्रीच्या वेळी कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की उद्यान, बीच आणि सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री आठ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहतील.

चित्रपटगृहे, आणि व्हिडिओ पार्लर इत्यादी बंद राहतील

निवेदनानुसार थिएटर, चित्रपटगृहे, व्हिडीओ पार्लर, मल्टिप्लेक्स, क्लब, जलतरण तलाव, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादी मनोरंजन स्थळे बंद राहतील. त्याचबरोबर धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. तथापि, तेथे धार्मिक विधी सुरूच राहतील. त्याचप्रमाणे बार, रेस्टॉरंट्स, छोटी दुकाने फक्त पॅकिंग व वाहून नेण्यासाठी व पार्सलसाठी खुली असतील.

स्थानिक प्रशासन बंदीची घोषणा करू शकते

दिवसा एखाद्या ठिकाणी गर्दी जमा होत असल्याचे स्थानिक प्रशासन त्याठिकाणी बंदची घोषणा करू शकते. त्यानुसार सार्वजनिक आणि खासगी परिवहन सेवा सुरू राहतील. टॅक्सी आणि ऑटोरिक्षा त्यांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्के जागा ठेवू शकतात. बसमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार नाही. तसेच प्रवासावेळी मास्क घालणे बंधनकारक असेल. तसेच, बस चालक, कंडक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांकडे कोविड नकारात्मक चाचणी अहवाल असावा.

रात्रीचा कर्फ्यू सकाळी 8 ते सकाळी 7 या वेळेत लागू राहिल. दिवसा, कलम 144 अंमलात येईल, ज्यामध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी एकत्र येण्यास प्रतिबंधित केले जाईल. मॉल, रेस्टॉरंट्स, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. बांधकाम, बाजारपेठेवर कोणतेही बंधन नाही. शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्रात कडक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सल्लामसलतानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, हॉटेल, उद्योगपती आणि चित्रपट निर्माते यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे.