-बहुमत सिद्ध झाल्यानंतर सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आभार मानले आहेत.
-रविवारी पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता विधानसभा सभागृहाचे कामकाज पार पडणार आहे.  

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. यामुळे महाविकासआघाडीत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचसोबत मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लावलेले आक्षेप छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहेत.   

-महाविकासआघाडीकडून विधानभवनाच्या सभागृहात सिद्ध झाले आहे. पण माकप, मनसे आणि एमआयएम यांनी तटस्थ भुमिका घेतली आहे. तर 169 आमदार हे ठाकरे सरकारच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

-महाविकासआघाडी सरकराचे विधानसभेत बहुमत सिद्ध झाले असून त्यांच्याकडे एकूण 169 आमदार आहेत. 
-मनसे, एमआयएम आणि माकप तटस्थ 

-ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीला सुरुवात झाली असून महाविकासआघाडीच्या सर्व आमदारांकडून स्वत:ची ओळख सभागृहात  करुन देण्यात येत आहे. 

-सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बहुमत चाचणीसाठी मतांची मोजणी होणार आहे. आवाजी मतदानानंतर आता शरणागतीचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदारांचा सभात्याग केला आहे. 
-सभागृहाचे दरवाजे बंद करा, हंगामी अध्यक्षांचे आदेश 
- देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडत सरकारने हे अधिवेशन नियमाला धरुन नसल्याचे म्हटले आहे. 
-नव्या अधिवेशनाचा समन्स काढण्यात आलेला नाही-फडणवीस    

-अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला असून सुनील प्रमोद यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन केले आहे.  

-देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप हंगामी अध्यक्षांनी फेटाळले आहेत.
-हंगामी अध्यक्ष निवडण्याचे अधिकार मंत्रिमंडळाला- दिलीप वळसे 
-सभागृह चालण्याचा हक्क प्राप्त झाला- वळसे 
-देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना हंगामी अध्यक्षांनी  उत्तर दिले आहे. 
-सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विश्वासदर्शक ठराव-वळसे  

-महाविकासआघाडीच्या मंत्र्यांचा परिचय, शपथ यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. 
-मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 
-संविधानाच्या नियमानुसार शपथविधी पार पडला नाही. 
-देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बददला नसल्याचे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे. 
-हंगामी अध्यक्ष बदलण्यावर भाजपचा तीव्र आक्षेप  

-दादागिरी नही चलेगी म्हणत भाजप आमदरांनी विधानसभेच्या सभागृहात घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. 

Load More

महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेतली. त्याच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी 2-2 नेते मंडळींचा सुद्धा मंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रलायात जाऊन अधिकृतरित्या पदाचा कारभार सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांच्या या पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळात शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आढावा घ्या असे आदेश सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिले असून यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. तसेच दुपारी 2 वाजता विधानसभेचे कामकाज सुरु होणार आहे. या महाविकासआघाडीच्या सरकारला बहुमताचा ठराव आज विधानसभेत मंजूर करावा लागणार आहे. महाविकासआघाडीचेकडे संख्याबळ जवळजवळ 170 च्या घरात आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा केली जात आहे. तर नव्या विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयावर भाजपची टीका; 'अत्यंत घृणास्पद निर्णय !')

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून सुरु असणाऱ्या महाराष्ट्र सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी कमालीची लीड घेतली होती, शिवसेनेचा गाडा हाकताना अनेकदा त्यांनी पूर्व मित्रपक्ष भाजपवर घणाघाती हल्ले सुद्धा केले. आता तर अखेरीस सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शिवसेना सत्तेच्या प्रश्नावर आणखीनच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

तर काही दिवसांपूर्वी राजकीय भुकंप राज्यात पहायला मिळाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने मिळून भाजपला सुप्रीम कोर्टात खेचले. सुप्रीम कोर्टाच्या बहुमत चाचणीच्या आदेशानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.