High Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता
यंदा 1 सप्टेंबर दिवशी सर्वात मोठी भरती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही भरती 4.91 मीटरची असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mumbai Monsoon 2019 High Tide: यंदा भारतामध्ये समाधानकारक आणि योग्य वेळेत मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी स्कायमेटने व्यक्त केला होता. त्यानंतर जून ते सप्टेंबर 2019 या काळात महाराष्ट्रामध्ये 28 दिवस भरतीच्या (High Tide) लाटा 4.5 मीटरच्या वर जाण्याची शक्यता असल्याचा भारताच्या वेधशाळेने (India Meteorological Department) हा अंदाज व्यक्त केला आहे. मागील मान्सूनमध्ये (Monsoon) हे भरतीचे दिवस केवळ 24 होते. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यावर्षी समाधानकारक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2019 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

