Congress MLAs Meets Sonia Gandhi: राज्यातील काँग्रेस आमदारांची बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांच्या विरोधात सोनिया गांधींकडे तक्रार

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि काँग्रेस यांचे युतीचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला होत असलेल्या विलंबावर सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली.

Congress MLAs Meets Sonia Gandhi: राज्यातील काँग्रेस आमदारांची बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांच्या विरोधात सोनिया गांधींकडे तक्रार
Balasaheb Thorat, Sonia Gandhi And Ashok Chavan

महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांच्या (Congress MLAs) शिष्टमंडळाने मंगळवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) या ज्येष्ठ मंत्र्यांविरोधात तक्रार (Complaint) केल्याचे समजते. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींसोबत सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या बैठकीत (Congress Meeting) 22 आमदारांच्या शिष्टमंडळाने काँग्रेस विधिमंडळ पक्षात समन्वयाचा अभाव आणि आमदारांसाठी विकासकामांसाठी राखून ठेवलेला सरकारी निधी न मिळणे यासारखे मुद्दे उपस्थित केले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि काँग्रेस यांचे युतीचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला होत असलेल्या विलंबावर सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली. बैठकीत विकास ठाकरे, कुणाल पाटील, संग्राम थोपटे यांच्यासह आमदारांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षांच्या आमदारांना प्रभावीपणे मदत केली, तर काँग्रेसचे आमदार विधानसभेत दुर्लक्षित राहिले. हेही वाचा Vasant More: मनसेचे वसंत मोरे 'शिवतीर्थ'वरुन बाहेर पडले, राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल काय म्हणाले? घ्या जाणून

सोनिया गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीला होत असलेल्या विलंबावर चिंता व्यक्त केल्याचे समजते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे.  विविध राज्य महामंडळांमधील नियुक्त्यांचा मुद्दाही आमदारांनी उपस्थित केला आणि तीन आघाडीच्या भागीदारांच्या सहभागासाठी पारदर्शक प्रक्रियेची वकिली केली.

या बैठकीत सोनिया गांधी यांनी आमदारांना त्यांच्या तक्रारी लेखी देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सुरू आहे. ज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश असून, सर्व पक्षांच्या समन्वयानेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2019 पासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2022 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).