Asaduddin Owaisi Statement: मुस्लिमांना आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणार, असदुद्दीन ओवेसींचा इशारा

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन (Agitation) करणार आहे.

Asaduddin Owaisi Statement: मुस्लिमांना आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणार, असदुद्दीन ओवेसींचा इशारा
असदुद्दीन औवेसी (Photo Credits-ANI)

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन (Agitation) करणार आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या सद्य परिस्थितीवर औरंगाबादमध्ये दुआ फाऊंडेशन आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस आयोजित परिषदेत सहभागी झाल्यानंतर ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. AIMIM नेत्याने दावा केला की, कोर्टाने मान्य केले आहे की मुस्लिम समाजातील 50 जातींना आरक्षण दिले पाहिजे. मात्र, सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला पाठिंबा देत असले तरी मुस्लिम आरक्षणाबाबत कोणीही बोलत नाही.

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत.  नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात राज्य सरकारने आरक्षणासाठी अध्यादेश आणावा, अशी आमची इच्छा आहे.मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन करावे आणि AIMIM त्यांना पाठिंबा देईल, असे ओवेसी म्हणाले. ते म्हणाले, राज्यात अनेक दिवसांपासून मराठा समाज गप्प आहे. त्यांनी आंदोलन करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. राज्यातील अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत ओवेसी म्हणाले की, या घटनेची चौकशी झाली पाहिजे.

हैदराबाद पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिझवी यांनी मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवला आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. त्याच्या तक्रारीनंतर हैदराबादमधील कामाटीपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा Anil Deshmukh Case: अनिल देशमुखांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर, पीएमएलए न्यायालयाचा निर्णय

वसीम रिझवी यांनी एक पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी पैगंबर मोहम्मद यांना बदनाम केले आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला आहे. ते म्हणाले की, रिझवी यांच्या विधानांना भारतातील मुस्लिमांविरुद्ध शत्रुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी देखील लक्ष्य केले जाऊ शकते, ज्यामुळे शांतता भंग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2021 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).