Heart Disease Death in Mumbai: मुंबईतील मृत्यूचे प्रमुख कारण हृदयविकार; कर्करोग, पक्षाघात आणि यकृताच्या आजारांमुळेही प्राण जाण्याचे वाढते प्रमाण

मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून मुंबईला हृदयविकाराचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने मागवलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Heart Disease Death in Mumbai: मुंबईतील मृत्यूचे प्रमुख कारण हृदयविकार; कर्करोग, पक्षाघात आणि यकृताच्या आजारांमुळेही प्राण जाण्याचे वाढते प्रमाण

मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून मुंबईला हृदयविकाराचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने मागवलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती शहराच्या वार्षिक मृत्यू दरावर प्रकाश टाकतो. खास करुन यकृत रोग, कर्करोग आणि सेरेब्रोव्हस्कुलर विकारांच्या वाढत्या प्रभावावर. उपलब्ध माहितीनुसार, 2022 च्या मृत्यूच्या आकडेवारीच्या तपशीलवार विश्लेषणात यकृत निकामी झाल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये तीव्र वाढ दिसून येते, 2021 च्या तुलनेत 17% वाढ आणि 2020 मधील 40% वाढ - 2020 मध्ये 1,377 मृत्यूंवरून 2020 मध्ये 1,902 मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ही आकडेवारी देते.

आरटीआय मार्फत मिळालेल्या माहितीचे प्रमुख निष्कर्ष:

यकृत निकामी झाल्याने मृत्यू: मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये यकृत निकामी-संबंधित मृत्यूंमध्ये लक्षणीय 17% वाढ, 2020 च्या तुलनेत जवळपास 40% वाढ झाली आहे.

कर्करोगामुळे मृत्यू: 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये कर्करोगाशी संबंधित मृत्यूंमध्ये 10% वाढ, मुंबईत 10,028 कर्करोगाने मृत्यूची नोंद झाली.

सेरेब्रोव्हस्कुलर डिसऑर्डर: सेरेब्रोव्हस्कुलर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 6-8% वार्षिक वाढ होत आहे. ज्यामुळे दररोज सरासरी 14 मृत्यू होतात.

यकृत रोग वाढीस कारणीभूत घटक: अती प्रमाणात मद्यसेवन हा यकृत निकामी प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरणारा संभाव्य आणि तीव्र घटक म्हणून पुढे आला आहे. यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे, यकृताच्या संकटात हिपॅटायटीस बी आणि सी संसर्ग झाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे यकृत निकामी होण्याची शक्यता वाढते. (हेही वाचा, National Cancer Awareness Day 2023: 'कॅन्सर' बाबत जागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबरला पाळला जातो खास दिवस; जाणून घ्या या आजाराबद्दल काही फॅक्ट्स)

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हृदयरोगामुळे जवळजवळ 17,000 लोकांचा बळी जातो. हृदयरोग हे अनेकांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण राहिले आहे. प्राप्त माहितीनुसार, अंदाजे 10,000 मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याशी निगडीत होते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि सेरेब्रोव्हस्कुलर इव्हेंट्सच्या वाढीचा परीणाम शारीरीक धोका वाढवतात. खास करुन त्या मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या वाढीला निमंत्रण देतात.

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2023 12:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).