Mahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंतन प्रेरणा देणारे विचार, वाचा आणि आत्मसात करा, जाणवेल परिवर्तन
महापरिनिर्वान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आपण येथे वाचू शकता. जे आत्मसात केल्याने तुम्हाल अल्पावधीतच चांगले परिवर्तन पाहायला मिळू शकते.
Dr. Babasaheb Ambedkar Thoughts In Marathi: भीमराव रामजी आंबेडकर (Bhimrao Ramji Ambedkar) अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना अवघा भारत आणि जग 'भारतरत्न', 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' आणि 'भारतातील संबंध मानव जातीचे उद्धारकर्ते', 'सामाजित चळवळीचे प्रणेते','बहुआयामी व्यक्तीमत्व' म्हणून ओळखले जाते. एक असे व्यक्तीमत्व, ज्यांना जगभरातील काही मोजक्या लोकांमध्ये गणले जातात. उच्चविद्याविभूषीत 'बौद्ध कार्यकर्ते', 'इतिहासकार', 'राजकीय नेते', 'विद्वान', 'अर्थशास्त्रज्ञ', 'लेखक', 'वक्ते', 'मानववंशशास्त्रज्ञ', 'तत्त्वज्ञ', 'न्यायशास्त्रज्ञ' आणि 'संपादक' अशा नानाविध भूमिका त्यांनी आपल्या संबंध आयुष्यामध्ये निभावल्या. ते भारताचे पहिले कायदा मंत्रीही राहिले आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 आणि मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. त्यांच्या निधनाचा दिवस महापरीनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभांचे आयोजन करण्यात येते. आपणही या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार (Dr. Babasaheb Ambedka Quotes In Marathi) येथे वाचू शकता. जे आत्मसात केल्याने तुम्हाल अल्पावधीतच चांगले परिवर्तन पाहायला मिळू शकते.
- मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवणारा धर्म आवडतो. भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील नश्वर संघर्षाचा इतिहास आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- बुद्धाची शिकवण शाश्वत आहे. तरीही बुद्धाने त्या अतुलनीय असल्याचे म्हटले नाही. बुद्धाच्या धर्मात काळानुरूप बदलण्याची क्षमता आहे. या गुणाचा दावा अन्य कोणताही धर्म करू शकत नाही. जर तुम्ही नीट अभ्यास केलात तर तुम्हाला दिसेल की बौद्ध धर्म तर्कावर आधारित आहे. लवचिकतेचा एक घटक त्यात अंतर्भूत आहे, जो इतर कोणत्याही धर्मात आढळत नाही. (हेही वाचा, Mahaparinirvan Din 2023 Messages: महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारा करा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!)
- आयुष्य लांब असण्यापेक्षा महान असावे. मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.
- महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो. कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो. (हेही वाचा, Mahaparinirvan Din Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' अनमोल विचार शेअर करून करा महामानवाला त्रिवार अभिवादन!)
- उदासीनता हा सर्वात वाईट प्रकारचा रोग आहे. जो लोकांना प्रभावित करू शकतो.
- मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्या व्यक्तीचे मन मुक्त असते तो तो खरा स्वतंत्र असतो. ज्याचे मन मुक्त नाही तो गुलाम असतो. ज्याचे मन मुक्त नाही तो तुरुंगात नसला तरी तो कैदी आहे.
डॉ. आंबेडकर म्हणतात की, मला वाटत नाही की भारतीय म्हणून आपली निष्ठा कोणत्याही स्पर्धात्मक निष्ठेने प्रभावित व्हावी. मग ती निष्ठा आपल्या धर्मातून, आपल्या संस्कृतीतून किंवा आपल्या भाषेतून उद्भवलेली असो. मला वाटते की सर्व लोक प्रथम भारतीय असावेत, भारतीयच असावेत आणि भारतीयच नसावेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2023 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

