#MeToo आकाशवाणीत ही खळबळ, राज्यवर्धन राठोड यांना मेनका गांधींचे पत्र
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांना मीटू प्रकरणी पत्र लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये मीटू च्या वादळाने डोके वर काढले होते. त्यानंतर अनेकांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक आरोपाचे उघडपणे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर हे मीटू चे वादळ आता थेट आकाशवाणीत येऊन धडकले आहे. त्यामुळे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांना या प्रकरणी पत्र लिहिले आहे.
आकाशवाणीतील काही सहकाऱ्यांनी मीटू प्रकरणी केलेल्या आरोपांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी कडक नियमावली तयार करुन त्यांना अशा गोष्टींना बळी पडण्यापासून वाचवावे असे मेनका गांधी यांनी या पत्राद्वारे लिहिले आहे. तसेच आकाशवाणीत झालेल्या सहकाऱ्यांच्या छेडछाडीची प्रथम काटेकोरपणे दखल घेतली नाही.
Union Minister Maneka Gandhi has written to I&B minister RS Rathore over reports of women working as casual announcers in All India Radio (AIR) being allegedly sexually harassed, asks him to ensure that a sensitive&fair system is put in place to address any such grievances in AIR pic.twitter.com/JnvbRpb1pb
— ANI (@ANI) November 15, 2018
मात्र आता मेनका गांधी यांनी या पत्राद्वारे या आरोपांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्यवर्धन राठोड या प्रकरणी कोणती ठोस पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2018 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

