
Karnataka Politics News: कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा (G Parameshwara) यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या संभाव्य बदलीबाबतच्या चर्चा आणि वृत्तांना ठामपणे फेटाळून लावले आहे. सध्या सुरू असलेल्या म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) प्रकरणात मुख्यमंत्री बदलण्याचा "प्रश्नच नाही" असे परमेश्वरा यांनी म्हटले आहे. बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी बोलताना परमेश्वरा यांनी सोमवारी (9 ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सरकार आणि प्रशासन सक्रीय आहे. प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. त्यामुळे आपण न्यायलयाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी, असेही त्यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रशासन सुरळीतपणे काम करत आहे. खटला कोर्टात आहे, थांबूया आणि काय होते ते पाहूया. या विषयावर चर्चा सुरू करण्याची गरज नाही," असे परमेश्वरा यांनी पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री बदलाबात भाजपकचा दावा
गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी केलेल्या टिप्पणीला देखील उत्तर दिले, ते म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्यासारखी परिस्थीत मुळीच नाही. तरीही त्यांच्या पदाबाबत पक्षाचे नेते निर्णय घेऊन नेतृत्वात बदल करू शकतात. पण तशी कोणतीच स्थिती सध्यातरी दिसत नाही. भाजपला आमच्या पक्षाच्या बाबींची काळजी का वाटावी? त्यांनी त्यांचे अंतर्गत प्रश्न सोडवावेत. आम्हाला आमचा पक्ष सांभाळू द्यावा. आमचे निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत. प्रकरणाने कर्नाटकच्या राजकारणात हालचाल वाढवली आहे. (हेही वाचा, Karnataka: नेहाच्या हत्येच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची भाजप महिला मोर्चासोबत निदर्शने)
मंत्री एम.बी.पाटील यांच्या निवासस्थानी भेट आणि खुलासा
मंत्री एम.बी.पाटील यांच्या घरी नुकत्याच झालेल्या भेटीबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना परमेश्वरा यांनी या बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की, यत्तीनाहोल प्रकल्प कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही भेट त्यांच्या प्रवासाच्या योजनांचा एक भाग होती. आम्ही एकत्र निघणार होतो. आम्ही प्रवास करण्यापूर्वी एम.बी. पाटील यांनी मला त्यांच्या घरी न्याहारीसाठी बोलावले. आम्ही तिथे असताना, आम्हाला कळले की मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानावरून निघण्याच्या तयारीत आहेत. आम्ही त्यांना कळवले की आम्ही नंतर त्यांच्यासोबत जाऊ. ही भेट राजकीय नव्हती असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
सिद्धरमय्या कोर्टाच्या कामात व्यग्र, प्रशासन सक्रीय
प्रशासनावर होणाऱ्या परिणामाबाबत प्रश्न विचारला असता, परमेश्वरा यांनी जोर दिला की, प्रशासनावर त्याचा परिणाम होत नाही. "कोणताही व्यत्यय नाही. प्रत्येक मंत्री त्यांचे विभागीय काम करत आहेत. मुख्यमंत्री न्यायालयीन कामकाजात व्यस्त असल्याने ते कार्यक्रमांना उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु प्रशासन सुरळीत सुरू आहे," अशी पुष्टीही त्यांनी केली.
यत्तीनाहोल प्रकल्पाबाबत पर्यावरणाची चिंता
यत्तीनाहोल प्रकल्पाशी संबंधित पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने घेतलेल्या आक्षेपांबाबत, परमेश्वराने सांगितले की पर्यावरणाशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये काम पूर्ण झाले आहे. त्यांनी आश्वासन दिले की पर्यावरणाची हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि वन्यजीव मंडळाने उपस्थित केलेल्या कोणत्याही समस्या संबंधित विभाग दूर करतील.
युवक काँग्रेसच्या निवडणुकांबाबत, परमेश्वराने भर दिला की निवड प्रक्रिया सर्वांसाठी खुली होती. मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या मुलांप्रति कोणताही पक्षपात दाखवला गेला नाही. जर ते सक्षम असतील तर त्यांची निवड केली जाईल; अन्यथा, इतरांची निवड केली जाईल. कोणाच्याही मुलांच्या पसंतीचा प्रश्नच नाही. ही गुणवत्तेवर आधारित निवड आहे," त्यांनी दुजोरा दिला.