Nitin Gadkari On Road Safety And 6 Airbags Car: नितिन गडकरी यांची मोठी घोषणा, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून ड्रायव्हरच्या एअरबॅग्ज आणि 1 जानेवारी 2022 पासून ड्रायव्हरसमोर सह-प्रवासी एअरबॅग्ज लागू करणे बंधनकारक केले आहे.

Nitin Gadkari On Road Safety And 6 Airbags Car: नितिन गडकरी यांची मोठी घोषणा, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य
Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Road Safety And 6 Airbags Car) अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. एअरबॅग्ज अनिवार्य करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या मसुद्याच्या GSR अधिसूचनेला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून ड्रायव्हरच्या एअरबॅग्ज आणि 1 जानेवारी 2022 पासून ड्रायव्हरसमोर सह-प्रवासी एअरबॅग्ज लागू करणे बंधनकारक केले आहे.

Tweet

चारचाकी वाहनांच्या पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमधील प्रवाशांवर होणारा टक्कर कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणीमध्ये म्हणजेच आठ आसनी वाहनांमध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग्ज असणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात वाहने नेहमीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल, असेही गडकरी म्हणाले. (हे ही वाचा EPFO Cash Withdrawal: खुशखबर! आता PF खातेधारक गरज पडल्यास काढू शकतात 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, लहान कारमध्येही सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात एअरबॅग असणे आवश्यक आहे. सामान्यतः छोट्या गाड्या मध्यमवर्गीय लोक कमी उत्पन्न गटातील लोक खरेदी करतात. श्रीमंतांनी खरेदी केलेल्या मोठ्या गाड्यांमध्येच ऑटो कंपन्या आठ एअरबॅग का देतात, असा सवाल गडकरींनी केला होता. गडकरी म्हणाले होते की, सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी छोट्या स्वस्त कारमध्ये अधिक एअरबॅग्जचे आवाहन करत आहोत.

ते म्हणाले होते, “छोट्या गाड्या निम्न मध्यम उत्पन्न गटातील लोक खरेदी करतात. त्यांच्या कारमध्ये एअरबॅग नसतील तर त्यांचा अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे, मी सर्व कार उत्पादकांना त्यांच्या वाहनांच्या सर्व प्रकारांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज उपलब्ध करून देण्याचे आवाहन करेन. अतिरिक्त एअरबॅगमुळे छोट्या कारच्या किमतीत किमान 3,000 ते 4,000 रुपयांची वाढ होईल, असे त्यांनी मान्य केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 06:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).