Akhilesh Yadav On BJ: 'नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीत अनेक समस्या', क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यावरुन अखिलेश यादव यांची भाजपवर टीका
लखनौच्या क्रिकेट स्टेडियमला तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने 'एकना स्टेडियम' असे नाव दिले होते. उल्लेखनीय म्हणजे, एकना हे भगवान विष्णूच्या अनेक नावांपैकी एक आहे.
भाजपवर अप्रत्यक्ष टीका करताना, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी सांगितले की, विश्वचषकाता अंतिम सामना अहमदाबादऐवजी लखनऊमध्ये झाला असता तर टीम इंडियाने हाय-व्होल्टेज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप फायनल जिंकली असती. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलताना, सपा प्रमुख पुढे म्हणाले की जर सामना लखनौमध्ये झाला असता तर टीम इंडियाला भगवान विष्णू आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आशिर्वाद मिळाला असता. (हेही वाचा - Rahul Gandhi Panauti Remark: खेळाडूंनी विश्वचषक जिंकला असता, पण 'पनौती'ने आम्हाला हरवले... राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर टोला, पाहा व्हिडिओ)
लखनौच्या क्रिकेट स्टेडियमला तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने 'एकना स्टेडियम' असे नाव दिले होते. उल्लेखनीय म्हणजे, एकना हे भगवान विष्णूच्या अनेक नावांपैकी एक आहे. नंतर, 2018 मध्ये, माजी पंतप्रधान आणि भाजपच्या दिग्गजांचा सन्मान करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने त्याचे 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम' असे नामकरण केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीत काही समस्या होत्या त्यामुळे खेळाडूंची तयारी अपूर्ण राहिली, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2023 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

