
Mamta Banerjee On Mahakumbh: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रयागराज महाकुंभवर (Maha Kumbh 2025) वादग्रस्त विधान केले आहे. मौनी अमावस्येला महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीवर टीका करताना त्यांनी 'महाकुंभ आता मृत्युच्या कुंभात बदलला', असे म्हटले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. Maha Kumbh 2025 Conclude Date: 2025 चा महाकुंभ मेळा कधी संपणार? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
प्रयागराजमधील महाकुंभात व्हीआयपींना सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. पण गरिबांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाकुंभात येणाऱ्या भाविकांना सुविधा नाकारल्या जात आहेत. महाकुंभात भाविकांची गर्दी, प्रयागराज संगम स्टेशन बंद होणे आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी यावरून त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला त्यांनी सरकारवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की महाकुंभ आता मृत्युकुंभात रूपांतरित झाला आहे. व्हीआयपी लोकांना सुविधा पुरवल्या जात आहेत. परंतु सर्वसामान्यांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंनंतर मृतदेह शवविच्छेदन न करता बंगालला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी
Kolkata: On #MahaKumbh2025, West Bengal CM Mamata Banerjee says, "This is 'Mrityu Kumbh'...I respect Maha Kumbh, I respect the holy Ganga Maa. But there is no planning...How many people have been recovered?...For the rich, the VIP, there are systems available to get camps (tents)… pic.twitter.com/6T0SyHAh0e
— ANI (@ANI) February 18, 2025
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देशाचे विभाजन करण्यासाठी धर्म विकला जात आहे. महाकुंभातून आलेल्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम बंगालमध्ये करण्यात आले. मृत्यु प्रमाणपत्राशिवाय महाकुंभातून मृतदेह पाठवण्यात आले. अशाप्रकारे, मृतांच्या अवलंबितांना भरपाई कशी मिळेल? यापूर्वी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपाल सिंह यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत योगी सरकारला घेरले होते.