Jobs in Indian Railways: भारतीय रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी; RPF मध्ये भरली जाणार 32,000 पदे
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2014 ते 2024 दरम्यान रेल्वेमध्ये 5.02 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. हा आकडा 2004 ते 2014 दरम्यान यूपीए सरकारने दिलेल्या 4.11 लाख नोकऱ्यांपेक्षा 25 टक्के अधिक आहे.
Jobs in Indian Railways: तरुणांना भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) काम करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये तब्बल 32,000 पदे भरण्यात येणार आहेत. प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानंतर, रेल्वे मंत्रालयाने यावर्षी गट 'क' च्या विविध श्रेणींच्या पदांसाठी भरतीसाठी वार्षिक कॅलेंडर प्रकाशित करण्याची प्रणाली सुरू केली आहे. या क्रमाने, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची पदे भरण्यासाठी जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान 32,603 रिक्त जागांसाठी चार सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन्स (CEN) अधिसूचित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2014 ते 2024 दरम्यान रेल्वेमध्ये 5.02 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. हा आकडा 2004 ते 2014 दरम्यान यूपीए सरकारने दिलेल्या 4.11 लाख नोकऱ्यांपेक्षा 25 टक्के अधिक आहे. कोविड-19 मुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर 2.37 कोटींहून अधिक उमेदवारांच्या सहभागासह दोन प्रमुख परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
संगणक आधारित चाचणी (CBT) परीक्षा 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 पर्यंत 1.26 कोटी उमेदवारांसाठी घेण्यात आली. त्याचप्रमाणे, 1.1 कोटी पेक्षा जास्त उमेदवारांसाठी 17 ऑगस्ट 2022 ते 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत अजून एक सीबीटी घेण्यात आली.
रेल्वेमंत्री म्हणाले, भारतीय रेल्वेच्या कामकाजाचा आकार, अवकाशीय वितरण आणि गंभीरता लक्षात घेता, पदे रिक्त होणे आणि ती भरणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याचे नियमित कामकाज, तंत्रज्ञानातील आगामी बदल, यांत्रिकीकरण आणि नाविन्यपूर्ण पद्धती पूर्ण करण्यासाठी पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ पुरवले जाते. रेल्वेच्या परिचालनात्मक आणि तांत्रिक गरजांनुसार रिक्त जागा भरल्या जातात. (हेही वाचा; Additional Local Trains For Mumbai: मुंबईसाठी पुढील 5 वर्षांत अतिरिक्त 250 लोकल ट्रेन्स; रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांची घोषणा)
मंत्र्यांनी असेही सांगितले की, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) परीक्षा या तांत्रिक स्वरूपाच्या असतात, ज्यामध्ये कर्मचारी आणि संसाधनांची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव आणि मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याचे काम समाविष्ट असते. रेल्वेने या सर्व आव्हानांवर मात करून सर्व विहित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने भरती यशस्वीपणे पार पाडली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पेपरफुटीची किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

