Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा

एका कुटुंबाने 55 वर्षे देशावर राज्य केले आणि या काळात संविधानाला वारंवार आव्हान देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. संविधान कमकुवत करण्यासाठी या कुटुंबाने अनेक वेळा बेकायदेशीर कृत्य केले. 1951 मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला आणि संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले.

Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा
PM Modi's speech in the Lok Sabha (फोटो सौजन्य - ANI)

Parliament Winter Session: भारताच्या संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज लोकसभेत महत्त्वपूर्ण भाषण केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या लोकशाही प्रवासाला आकार देण्यासाठी संविधानाचे सखोल महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी संविधान हा भारतीय एकात्मतेचा आधार असल्याचे वर्णन केले, तसेच संविधानाच्या निर्मितीमध्ये देशातील प्रमुख दिग्गजांच्या भूमिकेवर देखील भर दिला. पंतप्रधानांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व करण्यात आले होते, ज्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांच्या मते, राज्यघटनेचा उद्देश केवळ भारताचे एकीकरण करणे हा नव्हता, तर देशाची लोकशाही संरचना मजबूत करणे हाही होता. देशाच्या एकात्मतेसाठी आणि समृद्धीसाठी संविधानाचा आदर करणे खूप महत्त्वाचे असल्याचेही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल -

यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावर आणि विशेषतः नेहरू-गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. एका कुटुंबाने 55 वर्षे देशावर राज्य केले आणि या काळात संविधानाला वारंवार आव्हान देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. संविधान कमकुवत करण्यासाठी या कुटुंबाने अनेक वेळा बेकायदेशीर कृत्य केले. 1951 मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला आणि संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. यासाठी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला जबाबदार धरले आणि त्यांच्या निर्णयांमुळे भारतीय लोकशाही कमकुवत झाल्याचा दावा केला. (हेही वाचा -Rahul Gandhi in Lok Sabha: संविधानाचा गौरव करत आरएसएस आणि सावरकर मुद्द्यावरुन राहुल गांधी बरसले)

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनणार -

आज भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. लवकरच देश जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. संविधानाच्या एकतेच्या भावनेला पुढे नेण्यासाठी त्यांच्या सरकारने अनेक पावले उचलली आहेत. विशेषतः कलम 370 रद्द करण्यात आले. संविधानाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सरकार एकता आणि समृद्धीसाठी सतत काम करत असल्याच्या मुद्द्यावर देखील यावेळी पंतप्रधानांनी भर दिला. (हेही वाचा - ‘Modi Adani Bhai Bhai’: 'मोदी अदानी भाई-भाई' काँग्रेसचे संसद परिसरात निदर्शन; काळ्या पिशव्या घेऊन प्रियंका आणि राहुल गांधींचा सहभाग)

भारत लोकशाहीची जननी - पंतप्रधान मोदी

आपल्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी जागतिक लोकशाही परिदृश्यात भारताच्या अद्वितीय स्थानाचा देखील उल्लेख केला. तसेच त्यांनी भारताला केवळ मोठी लोकशाहीच नाही तर 'लोकशाहीची जननी' असे संबोधले. हजारो वर्षांच्या लोकशाही परंपरांमुळे भारत हा केवळ एक मोठी लोकशाही नसून लोकशाहीची जननी आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. याशिवाय, भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

पंतप्रधान मोदींनी नवीन शैक्षणिक धोरणावर टाकला प्रकाश -

संविधान निर्मात्यांनी स्थापित केलेल्या एकता आणि विविधतेच्या भावनेच्या दिशेने सध्याच्या सरकारने अनेक पाऊले उचलली असल्याचे मीदींनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी विशेषत: नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख केला, ज्यामध्ये मातृभाषेला महत्त्व देण्यात आले आहे. राज्यघटनेच्या विचारधारेशी सुसंगत असलेल्या मातृभाषेत शिक्षण घेऊन आता गरीब कुटुंबातील मुले डॉक्टर आणि इंजिनिअर होऊ शकतात, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूदे केलं.

(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2024 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).