Ban on International Flights: 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमाने; DGCA ने वाढवला निर्बंध
मार्चपासून देशात लॉक डाऊन (Lockdown) सुरु आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून काही प्रमाणत शिथिलता आणली गेली आहे. मिशन बिगेन अंतर्गत आज महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोघांनीही 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत.
मार्चपासून देशात लॉक डाऊन (Lockdown) सुरु आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून काही प्रमाणत शिथिलता आणली गेली आहे. मिशन बिगेन अंतर्गत आज महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोघांनीही 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. आता आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाण सेवांवरील (International Flights) बंदी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) बुधवारी ही माहिती दिली. डीजीसीएने सांगितले की कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय विमाने घेण्यावरील बंदी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि 23 मार्च रोजी सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई प्रवास सेवांवर बंदी घालण्यात आल्या. घरगुती हवाई प्रवास सेवा 25 मेपासून सुरू केली गेली होती, परंतु आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सेवा अद्याप पुनर्संचयित केली गेली नाही. मात्र प्राधिकरणाद्वारे निवडलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय अनुसूचित उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते, असे डीजीसीएच्या परिपत्रकात म्हटले आहे.
— DGCA (@DGCAIndia) September 30, 2020
हे निर्बंध आंतरराष्ट्रीय ऑल कार्गो ऑपरेशन्स आणि विशेषत: डीजीसीएने मंजूर केलेल्या उड्डाणांना लागू होणार नाहीत. ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या स्थगितीला सरकारने अखेर 30 सप्टेंबर, बुधवारपर्यंत मुदतवाढ दिली होती.
दरम्यान, आज केंद्र सरकारने देशात 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्सला उघडण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय मनोरंजन पार्क उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशातील शाळा आणि कोचिंग संस्था उघडण्याबाबत राज्य सरकारला 15 ऑक्टोबरनंतर निर्णय घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी)
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार, राज्यात हॉटेल्स/फूड कोर्ट्स/रेस्टॉरंट्स आणि बार यांना प्रभावीपणे ऑपरेट करण्याची परवानगी दिली जाईल. 5 ऑक्टोबर, 2020 पासून 50% क्षमतेसह या गोष्टी सुरु होतील.
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2020 10:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

