गोव्यात 7 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातील एक रुग्ण बरा झाला आहे. मात्र त्याला पुढील 14 दिवसांसाठी विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सद्य स्थितीत गोव्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 वर आली आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

नवी दिल्लीत 93 नव्या रुग्णांसह दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 669 वर जाऊन पोहोचली आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.

पुण्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता मृतांची संख्या 18 वर पोहचली असून, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू आज झाला आहे: पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यातील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्यक्तींपैकी 25 जण कोरोन व्हायरस बाधित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. यामध्ये लातूर 8, बुलढाणा 6, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर प्रत्येकी 2, रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, वाशीम येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.

उत्तराखंडात 2 नवे कोरोना बाधित आढळले असून येथील रुग्णांची संख्या आता 35 वर गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

शिमल्यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्याचा वापर करून रस्त्यांचे निर्जतुकिकरण  करण्यात आले आहे. एएनआयने या घटनेचे फोटो शेअर केले आहेत.

  

दिल्लीत मास्क लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. यात तीन लेअर असलेला कपडा किंवा रुमाल तोंडाला बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रात मुंबई तसेच पुण्यातील नागरिकांना तोंडावर मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.


 

यवतमाळमध्ये 8 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

कोरोना व्हायरसच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे देशातील प्रयोगशाळांना दिले आहेत. यासंदर्भात केंद्र तसेच राज्य सरकार निर्देश जारी करेल, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. देशातील नागरिकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात यावी, यासाठी वकिल शंशाक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

 

Load More

जगभरावरील भीषण संकट म्ह्णून सिद्ध झालेल्या कोरोना व्हायरसची आता भारतात 4789 जणांना लागण झाली आहे, देशात सद्य घडीला 4312 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 124 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे, तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 353 इतकी आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र राज्याला बसला आहे. मागील 12 तासात राज्यातील 150 नव्या कोरोनाबाधित प्रकरणाच्या सहित रुग्णांची संख्या ही 1018 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी आहे.

दुसरीकडे आज लॉक डाऊन 15 वा दिवस आहे, भारतामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान देशातील स्थितीपाहून हा लॉकडाऊन वाढवला जाणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात तर हा लॉक डाऊन वाढवला जाईलच याचे संकेत काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान आज चैत्र पौर्णिमेच्या तिथीवर हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेछा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे संकट असल्याने भाविकांनी घरीच हनुमानाचे पूजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.