असम येथे आज आणखी 157 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 13 हजार 662 वर पोहचली आहे. ट्विट-

 

महाराष्ट्र: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील दोस्ती कॉम्प्लेक्सजवळील दुकानांना आग लागली आहे. सध्या दोन फायर इंजिन, दोन द्रुत प्रतिसाद वाहने आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी उपस्थित आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई: मच्छीमार कॉलनीजवळील माहीममध्ये 57 इंच व्यासाची मुख्य पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. यामुळे माहीम, माटुंगा, दादर आणि प्रभा देवी भागातील पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बाधित भागाच्या रहिवाशांनी धीर धरावा व सहकार्य करावे असे आवाहन बीएमसीने केले आहे.

तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,366 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 1,407 रुग्ण बरे झाले आहेत. यासह एकूण रुग्णांची संख्या 7.89 लाखावर गेली आहे. सध्या राज्यात 10,882 सक्रीय रुग्ण आहेत व एकूण मृत्यूंची संख्या 11,777 झाली आहे.

बिहार: राजद नेते तेजस्वी यादव आणि इतर 18 जण तसेच 500 अज्ञात लोकांविरूद्ध, पटना येथील गांधी मैदानाबाहेर शेती कायद्याविरूद्ध परवानगी न घेता निषेध नोंदविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी आणि साथीच्या रोग अधिनियमातील अनेक कलमांखाली एफआयआर नोंदविला आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 4,922 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णसंख्या 18,47,509 वर पोहोचली आहे. आज 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एळून मृत्यूंची संख्या 47,694 झाली आहे.

टीआरपी घोटाळ्यातील आणखी एक आरोपी, रिपब्लिक टीव्ही पश्चिम विभाग वितरण प्रमुखाला मुंबई कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

दुबई येथून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या काही नागरिकांकडून 81.4 लाखांचे सोने आणि 7500 युरो जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कस्टम विभागाकडून एकाला अटक  ही केली गेली आहे.

CID मधील ममता यांच्या अधिकाऱ्यांना फक्त भाजपच्या नेत्यांना अडकवायचे आहे असे भाजप नेते सौमित्र खान यांनी म्हटले आहे.

राजस्थान येथे कोरोनाचे आणखी 2076 रुग्ण आढळले असून 20 जणांचा बळी गेला आहे.

Load More

महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) कहर काही प्रमाणात कमी झाला असला तरीही कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. यात आळंदीत (Alandi) येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने 4-5 लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीत येत्या 6 डिसेंबरपासून संचारबंदी (Curfew) लागू होणार आहे. 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान ही संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सप्ताहाला 20 ते 50 वारक-यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी (Anvay Naik Suicide Case) आता रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आज अलिबाग सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर दुसरीकडे कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर काल नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे.