1 ते 31 डिसेंबर पर्यंत कोटा, जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर, अजमेर, भिलवारा, नागोरे, पाली, टोंक, सीकर आणि गंगानगर या शहरी हद्दीत राजस्थान सरकारने संध्याकाळी 8 ते सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू लादला आहे.

कार्तिक पौर्णिमेनिमित्त वाराणसीमधील चेतसिंग घाट येथे रोषणाई करण्यात आली आहे. ट्वीट-

 

कोरोना नियमांच्या अधीन राहून धार्मिक स्थळे लोकांसाठी खुली राहतील. प्रवाशांना रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाद्वारे प्रवेश करण्यास कोणतीही बंधने नाहीत. मात्र त्यांना COVID19 Antigen चाचणी करून घ्यावी लागेल. जम्मू आणि काश्मीर सरकारने ही माहिती दिली आहे.

राजकोट येथील उदय शिवानंद रूग्णालयात 27 नोव्हेंबरला झालेल्या आगीच्या घटनेत 5 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेस कारणीभूत म्हणून 5 डॉक्टरांची नावे देण्यात आली आहेत. उद्या त्यांच्या कोरोनाचे अहवाल आल्यावर त्यांना अटक करण्यात येईलः मनोहरसिंह जडेजा, डीसीपी, राजकोट शहर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सध्याचे शेती कायदे आणि शेतकर्‍यांच्या निषेधाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते सांगतात की, 'पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी कायद्यांचा पुनर्विचार करायला हवा.'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अहमदाबादमधील सिंधू भवन चौराहा आणि सानंद चौराहा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांचे उद्घाटन  करणार आहेत. ट्विट- 

 

मुंबईत आज आणखी 940 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बांकुरा जिल्ह्यातील खात्रा येथील भाजप नेत्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप कार्यालयाची तोडफोड देखील केल्याचे समजत आहे. ट्विट-

 

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार गेल्या एक वर्षात अपयशी ठरली आहे. त्यांनी मतदाराला दिलेले एकही आश्वासनही पाळलेले नाही. आपापसात समन्वयाची कमतरता असल्याने जनता त्यांना कंटाळले आहे. त्यांचा संघर्ष संपेल आणि हे सरकार पडेल, अशा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्विट-

 

उद्धव ठाकरे आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत नेपियांसी रोड येथील प्रियदर्शिनी पार्क जवळील मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. ट्विट-

 

Load More

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे भेट देत लसीच्या विकासासंदर्भात आढावा घेतला. तर पुण्यातील सीरम इंस्ट्यिट्युट ऑफ इंडिया येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. तेथे गेल्यावर मोदी यांनी लस निर्मितीच्या  प्रक्रियेसंबंधित माहिती घेतली. त्यानंतर अदर पुनावाला यांनी असे म्हटले की, कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकांपर्यंत ही लस पोहचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच कोरोनावरील कोविशिल्ड ही लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात असल्याचे ही अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

तसेच देशभरातील शेतकरी फार्म बिलावरुन संतप्त झाले असून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करताना दिसून येत आहे. तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला जात असल्याचे ही आपण पाहिले. मात्र तरीही शेतकरी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर दिल्ली चलो आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत फार्म बिलाला तीव्र विरोध करणार आहेत. यासाठीच सीमेवर सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.  शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असे म्हटले की, शेतकऱ्यांशी बातचीत करण्यास तयार आहोत. तसेच सरकार त्यांच्या प्रत्येक मागणीवर विचार करण्यास ही तयार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 935110 वर पोहचला असून एकूण 136200 जणांचा बळी गेला आहे. तसेच 8759969 जणांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे.