पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील चिखली पोलिस ठाण्यात कोरोनाव्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी आणि 20 ते 25 संशियत अज्ञातांच्या विरुद्ध FIR नोंदवण्यात आली आहे. 27 मार्च रोजी हे आरोपी चिखली येथील एका इमारतीच्या गच्चीवर नमाज पठणासाठी जमले होते.
Maharashtra: FIR registered at Chikhali Police Station of Pimpri-Chinchwad area in Pune, against 13 accused & about 20-25 others (unidentified) for violating #CoronavirusLockdown orders, as they had gathered on a terrace of a building in Chikhali on 27 March to offer Friday namaz— ANI (@ANI) March 29, 2020
पंजाब मधील अमृतसर येथे कोरोना व्हायरसच्या 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Punjab reports second COVID-19 death, 62-year-old man dies in Amritsar— Press Trust of India (@PTI_News) March 29, 2020
महाराष्ट्र शासनाने राज्यभरात स्थलांतरित कामगार वर्गासाठी 262 मदत शिबिरांची स्थापना केली आहे . राज्यातील 70,399 स्थलांतरित कामगार / बेघर लोकांना अन्न मिळावे आणि राहायला जागा मिळावी यासाठी ही खास सोय करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra Government has set up 262 relief camps across the State which is presently providing shelter to 70,399 migrant labour/ the homeless people to ensure that they have food, and a roof in this crisis.#MaharashtraCares #WarAgainstVirus— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 29, 2020
शाहीनबाग येथील एका दुकानाला आज रविवार 29 मार्च रोजी संध्याकाळी अचानक आग लागली आहे, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Delhi: Fire breaks out at a shop in Shaheen Bagh area. More details awaited. pic.twitter.com/ZaCW5GqAzx— ANI (@ANI) March 29, 2020
Coronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली आहे. तसेच 96 जणांची कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, कोरोनामुळे 27 जणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्रालयाकडून यांसदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
Total number of #COVID19 positive cases rise to 1024 in India (including 901 active cases, 96 cured/discharged/migrated people and 27 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/ACfXl8xRNq— ANI (@ANI) March 29, 2020
पुण्यात आणखी 4 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 28 वर पोहचला आहे. पुण्याचे महापौर मुरलिधर मोहळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पुण्यात आणखी चार कोरोनाग्रस्त !
आपल्या पुणे शहरात दुबईहून परतलेल्या वडील-मुलीला तर बारामती आणि पुणे शहरातील प्रत्येकी एक जण, असे चार कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांचा आकडा २८ वर गेला आहे, त्यात ग्रामीणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा कोरोनाबाधित : ४०— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 29, 2020
कोरोनामुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून जर्मनीतील हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शाफर यांची आत्महत्या केली आहे. थॉमस शाफर हे गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारख टोकोचं पाऊल उचललं आहे. आज शाफर यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.
कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दुर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे व्हॉट्सअॅप नंबर जारी करण्यात आला आहे. +912026127394 या नंबरवर नागरिक आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. यासंदर्भात शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे.
Say Hi to this WhatsApp number!
+912026127394
And get response to your basic queries about Corona Virus https://t.co/kOVi4wMCNR— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 29, 2020
राज्यात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होणार नाही अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. दुकानदार ग्राहकांना चढ्या भावाने माल खरेदी करत आहेत. मात्र, आज छगन भुजबळ यांनी खाद्यतेलाच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नसल्याचे सांगितले आहे.
हरियाणामधील गुरुग्राम येथे भाजीपाल घेऊन जाणाऱ्या ट्रकने 5 जणांना चिरडले आहे. यात या पाच जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
गुरूग्राम में सब्जी के एक ट्रक ने कुछ लोगों को कुचल दिया। इस दुर्घटना में 5 लोगों की मौत हो गई और 6 लोग घायल हुए हैं: जय प्रकाश यादव, SHO, बिलासपुर पुलिस स्टेशन, गुरूग्राम pic.twitter.com/3wJU82mRku— ANI_HindiNews (@AHindinews) March 29, 2020
कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करु लागले आहे. भारत देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 900 च्या पार गेली असून महाराष्ट्र राज्यातही 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटाचा धोका टाळण्यासाठी देश यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र तरी देखील रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' या रेडिओ प्रोग्रॅम मधून आज सकाळी 11 वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव विचारात घेता जीवनावश्यक वस्तू वगळता सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. या गंभीर संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही विविध उपाययोजना करत आहे. राज्यातील विविध ठिकाणी साफसफाई केली जात आहे. तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मेडिकल स्टोर्स, किराणा मालाची दुकाने 24 तास उघडी राहणार आहेत. विशेष म्हणजे बाहेर जाणे टाळावे याकरता किराणा माल ऑनलाईन ऑर्डर करण्याचे आवाहनही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
विशेष म्हणजे या संकटावर मात करण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी विविध स्तरातून लोक पुढे सरसावले आहेत. नेते मंडळी, आमदार-खासदार यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीज, क्रीडापटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांनी मदतीची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे सामाजिक भान जपत काही लोक स्वतःहून पुढे येत स्थलांतरीत कर्मचारी, गरजू यांच्यासह अगदी प्राण्यांची काळजी घेतनाही दिसत आहेत.