आसाममध्ये आज आठ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

गेले काही दिवस पुणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण भरले आहे. खडकवासला धरणातून आज 7000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले.

गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यात आफ्रिकन स्वाइन तापामुळे 24 प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर, मेघालय सरकारने डुकरांच्या आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घातली आहे: उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टायन्सॉंग यांनी याबाबत माहिती दिली.

हरियाणामध्ये आज 793 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

पुणे शहरात आज नव्याने 1 हजार 91 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 256 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13254 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17967 झाली आहे.

मुंबईत आज कोरोनाचे आणखी 1200 रुग्ण आढळून आले असून 48 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील COVID19 चा आकडा 1,27,571 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 11,813 रुग्ण आढळले असून 413 जणांचा बळी गेला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी महापालिकेकडून आजपासून सेरो सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.

Load More

कोरोना व्हायरस संकटाशी संपूर्ण जग लढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच देशांच्या सीमा बंद आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B Visa धारकांना अमेरिकेत येण्यास परवानगी दिली आहे. व्हिसा बॅन होण्यापूर्वी ज्या नोकरीत ते रुजू होते. तोच जॉब त्यांना करावा लागणार आहे. या अटीवर अमेरिकेत परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचे आर अँड आर हॉस्पिटलमधून सांगण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया त्यांच्यावर पार पडली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांची कोरोना विषाणूंची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशातसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. त्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. मात्र त्याचबरोबर अनेक प्रश्न राज्यासमोर आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण रंगत आहे. दिवसागणित नवनवी माहिती समोर येत असल्याने प्रकरणाला वेगळाचा रंग चढत आहे. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या/सत्राच्या परीक्षांचा संभ्रम अद्याप सुरुच आहे. परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.