पुण्यात कोरोनाचे आणखी 2840 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात  15 जणांचा बळी गेल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.

अफगाणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद अतमर येत्या 22 मार्चला भारतीय दौऱ्यावर येणार आहेत.

चैन्नई रेल्वे स्थानकातून 5.5 किलो चांदी आणि 19 लाखांची रोकड जप्त  करण्यात आली आहे.

Mansukh Hiren death case प्रकरणी ATS कडून मनसुख यांच्या पत्नीसह मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

हरियाणा येथे कोरोनाचे आणखी 442 रुग्ण आढळल्याने आकडा 2,73,888 वर पोहचला आहे.

आँध्र प्रदेशात खासगी कंपनीत बॉयर ब्लास्ट झाल्याने दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी  झाले आहेत.

मुंबईत आज 150  NSG कमांडो यांनी   BKC मधील जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये  कोरोनाची लस घेतली आहे.

मुंबईत आज 1539 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वयाच्या अटीचा विचार करू नये - मुख्यमंत्री  

आवश्यकता भासल्यास लॉकडाऊन करण्यात येईल. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येतील - मुख्यमंत्री 

Load More

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने. या प्रकरणात चर्चेत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली. त्यासाठी विरोधकांनी सरकारवर प्रचंड दबाव आणला होता. हे प्रकरण आता पुढे काय वळण घेते याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला कुख्यात डॉन रवी पुजारी याने न्यायालयात काल स्वत:हून पोलीस कोठडी वाढवून मागितली. रवी पुजारी याला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याबाबत अथवा त्यांना खंडणी मागितल्याबद्द काही माहिती द्यायची आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. असे असले तरी या सर्व केवळ चर्चा आहेत. सत्य बाहेर येण्यासाठी काही काळ वाटच पाहावी लागणार आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र होते. आता मात्र स्थिती उलट पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली आहे. काल (बुधवार, 10 मार्च) राज्यात 13, 659 कोरोना रुग्णांची नोंद झाली. परवाच्या म्हणजेच मंगळवारच्या (9 मार्च) तुलनेत ही संख्या चार हजारांनी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पूर्णत: तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वीज ग्राहकांना चांगलाच शॉक बसला. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबील वसुलीला दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठवली. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना आता यापुढे वीजबील भरले नाही तर त्यांची वीजपूरवठा खंडीत होऊ शकतो.

एका बाजूला देशभरात असलेले कोरोनाचे सावट. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणूक प्रचारासाठी होत असलेली प्रचंड गर्दी. हा विरोधाभास प्रकर्शने जाणवतो आहे. पश्चिम बंगाल, केरळ, असम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे कसे पालन केले जाते हेही पाहावे लागणार आहे.