Lawrence Bishnoi gang's threat to Bihar MP: लॉरेन्स बिश्नोई टोळीची बिहारच्या खासदाराला धमकी: 'तुमच्या मागवार, सलमान प्रकरणापासून दूर राहा'
पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईला खुले आव्हान दिले होते, जर परवानगी दिली तर ते 24 तासांच्या आत लॉरेन्स बिश्नोई सारख्या टू-बिट गुन्हेगारचे नेटवर्क उद्ध्वस्त करतील. त्यावर आता लॉरेन्स बिश्नोई टोळीने बिहारचे खासदार पप्पू यादव यांना सलमान प्रकरणापासून दूर राहण्याची सक्त ताकिद दिली आहे.
Lawrence Bishnoi gang's threat to Bihar MP: बिहारचे खासदार ( Bihar MP)पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून (Lawrence Bishnoi gang)जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पप्पू यादव यांनी दावा केला की बिश्नोई टोळी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अभिनेता सलमान खानशी(Salman Khan) संबंधित प्रकरणांपासून दूर न राहिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टोळीतील कोणीतरी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे यादव यांनी सांगितले आहे. बिष्णोई टोळीचे लोक सतत त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, स्वतः पप्पू यादव यांना कॉल आला. त्यात त्यांनी सांगितले की, टोळी त्यांच्या मागावर आहे. लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये जॅमर बंद करून पप्पू यादवशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने यादव यांना सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोई जॅमर बंद करण्यासाठी प्रति तास एक लाख रुपये देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पप्पू यादव यांनी बिहारच्या डीजीपीला या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. आपल्या सुरक्षेबाबत बिहार सरकार निष्क्रिय असल्याचे त्यांनी लिहिले आहे. (Lawrence Bishnoi Gang: देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 7 शूटर्सला अटक)
काय आहे पप्पू यादव आणि लॉरेन्स बिश्नोईचे प्रकरण?
12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला. या हत्येमागे बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यातील मैत्री असल्याचे सांगण्यात आले. काळवीट हत्ये प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. यानंतर पप्पू यादव याने या प्रकरणात प्रवेश केला.
13 ऑक्टोबर रोजी पप्पू यादव यांनी बिश्नोई टोळीला आव्हान देणारी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यात त्यांनी लिहिले होते की, 'एक गुन्हेगार तुरुंगात बसून लोकांना आव्हान देतो. सगळेच प्रेक्षक झाले आहेत. कधी मूसावाला, कधी करणी सेनाप्रमुख. आता एका उद्योगपतीने एका राजकारण्याला मारले. कायद्याने परवानगी दिली तर मी 24 तासांत लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुन्हेगाराचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करीन.'
पप्पू यादव यांच्या या पोस्टची मोठी चर्चा झाली होती. यानंतर त्यांनी मुंबई गाठून बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांची भेट घेतली. त्यांना सलमान खानलाही भेटायचे होते. मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे सलमान त्यांना भेटू शकला नाही. यानंतर त्याने सलमानशी फोनवर चर्चा केली आणि सांगितले की, मी प्रत्येक परिस्थितीत सलमान खानसोबत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2024 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

