Corona Virus Update: देशात गेल्या 24 तासांत 36,401 जणांना कोरोनाची लागण, तर 530 बाधितांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात कोरोनाच्या (Corona Virus) नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. पण तिसऱ्या लाटेचा (Third wave) धोका कायम आहे. अशा परिस्थितीत कोरोना चाचणी (Corona test) आणि लसीकरणाकडे (Vaccination) यावेळी जास्तीत जास्त लक्ष दिले जात आहे. केरळ (Keral) हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोनाचा कहर सुरू आहे. केवळ केरळमध्ये दररोज 60 टक्के कोरोना प्रकरणे नोंदवली जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) गुरुवारी सकाळी ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 36,401 नवीन कोरोना रुग्ण (Patient) आढळले आहेत. तर 530 कोरोना बाधित लोकांनी आपला जीव गमावला. एक दिवस आधी 35,178 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्याचवेळी, 24 तासांमध्ये 39,157 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. म्हणजेच काल 3286 सक्रिय प्रकरणे कमी झाली आहेत.

बुधवारी केरळमध्ये 21,427 कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. म्हणजेच 60 टक्के प्रकरणे केवळ केरळमध्ये आहेत. येथे साथीमुळे 179 लोकांचा मृत्यू झाला. केरळमध्ये नवीन प्रकरणांसह, संक्रमित लोकांची एकूण संख्या 37 लाख 25 हजार झाली आणि मृतांची संख्या 19,049 वर पोहोचली. तर एका दिवसात 18,731 लोक बरे झाले. तर महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रभाव आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 5,132 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा  Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात सर्वदूर आज पावसाची शक्यता; पहा मुंबई ते नाशिक मध्ये काय आहे अंदाज

कोरोना साथीच्या प्रारंभापासून एकूण 3 कोटी 23 लाख 22 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 4 लाख 33 हजार 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 25 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 3 लाख 64 हजार लोकांना अद्याप कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अशी बातमी आहे की भारतात लवकरच मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. आयसीएमआर-एनआयव्हीच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी याबाबत माहिती दिली आहे.  2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या फेज-2 आणि फेज -3 चाचण्या दरम्यान त्यांनी सांगितले की, सप्टेंबरपर्यंत मुलांसाठी स्वदेशी कोरोना लस भारतात येऊ शकते. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.