Asha Kiran Shelter Home Case: '14 मृत्यू हा योगायोग नाही'; आशा किरण शेल्टर होम मृत्यू प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले पाणी चाचणीचे निर्देश
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली जल बोर्डाला आशा किरण निवारागृहाच्या पाण्याची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. मृत महिलांपैकी अनेकांना क्षयरोगाचा त्रास असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
Asha Kiran Shelter Home Case: दिल्लीतील रोहिणी येथील आशा किरण शेल्टर होम (Asha Kiran Shelter Home) मधील मृत्यूप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने (, Delhi High Court) कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, राज्य सरकार संचालित केंद्रात एका महिन्यात 14 मृत्यू हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. जर केंद्रात जास्त गर्दी होत असेल तर तेथे राहणाऱ्या लोकांना इतर चांगल्या ठिकाणी पाठवावे. यासोबतच दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारच्या समाजकल्याण सचिवांना वैयक्तिकरित्या निवारागृहाला भेट देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बुधवारपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Indore Shelter Home Tragedy: युगपुरुष धाम स्वयंसेवी संस्थेच्या बाल आश्रमातील मुलांना कॉलराची लागण, रुग्णालयात उपचार सुरु)
तथापी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली जल बोर्डाला आशा किरण निवारागृहाच्या पाण्याची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. मृत महिलांपैकी अनेकांना क्षयरोगाचा त्रास असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर दिल्ली सरकारचे अधिकारी आता या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत. (हेही वाचा -Children Die at Delhi Shelter Home: दिल्लीतील आशा किरण निवारागृह बनले मृत्यूचे चेंबर; जुलै महिन्यात 13 मुलांचा गूढ मृत्यू)
जुलै महिन्यात 14 जणांचा मृत्यू -
या वर्षी जानेवारीपासून रोहिणी येथील आशा किरण निवारागृहात 28 जणांच्या मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी जुलै महिन्यात 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 महिला आणि 6 पुरुष (मुलासह) यांचा समावेश आहे. (हेही वाचा- मानवतेला काळीमा फासणारी घटना! झाशीतील पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये बाहेर ठेवण्यात आलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ)
दरम्यान, दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी शुक्रवारी महसूल विभागाला या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करून 48 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आशा किरण या समाजकल्याण विभागांतर्गत येतात, जे राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होते. राज कुमार आनंद यांनी एप्रिलमध्ये आम आदमी पक्ष सोडला आणि गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

