Bangladesh Death Toll: रेमल चक्रीवादळामुळे 10 नागरिकांचा मृत्यू, दीड लाख घरांचे नुकसान; सरकारकडून आपत्तीग्रस्तांना अन्नधान्याचा पुरवठा
रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशच्या किनारी भागात मोठे नुसकान झाले आहे. 10 नागरिकांचा मृत्यू (Death)झाला आहे. तर असंख्य घरे अक्षरश: नाहिशी झाली आहेत.
Bangladesh Death Toll: रेमल चक्रीवादळ (cyclone Remal)रविवारी रात्री बांगलादेशच्या किनारी भागात धडकल्याने तेथे 10 लोकांचा मृत्यू (Death)झाला, ढाका ट्रिब्यूनने आपत्ती व्यवस्थापन आणि मदत राज्यमंत्री मोहिब्बूर रहमानचा हवाला देऊन वृत्त दिले. शिवाय, रेमल चक्रीवादळात 150,457 घरांचे नुकसान झाले. यापैकी बांगलादेशातील 107 युनियन आणि 914 नगरपालिकांमध्ये 35,483 घरांचा समावेश आहे. यात घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे, असे मोहिब्बूर रहमान यांनी सांगितले. (हेही वाचा:Cyclone Remal Update: तेलंगणात 'रेमाल' चक्रीवादळाचा प्रभाव, मुसळधार पाऊस आणि वादळात 13 जणांचा मृत्यू)
सचिवालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती दिली. बांग्लादेश हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ रेमल कमकुवत झाले आहे. मृतांमध्ये भोला आणि बारिसाल जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आणि सातखीरा, खुलना, चितगाव आणि पटुआखली जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
मोहिब्बूर रहमान म्हणाले की, वादळामुळे १९ जिल्हे प्रभावित झाले आहेत ज्यात झलकाठी, बारिशाल, पटुआखली, पिरोजपूर, बरगुना, खुलना, सातखीरा, बागेरहाट, बरगुना, भोला, फेनी, कॉक्स बाजार, चटगाव, नोआखली, लक्ष्मीपूर, चांदपूर , गोपालगंज, शरियतपूर आणि जेसोर.
नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी किनारी जिल्ह्यांमध्ये एकूण 9424 आश्रयस्थान उघडण्यात आले आहेत. 800,000 हून अधिक लोकांनी तेथे आश्रय घेतला आहे. याशिवाय 52,146 पाळीव प्राणीही तेथे ठेवण्यात आले होते. चक्रीवादळग्रस्त भागातील लोकांना उपचार देण्यासाठी एकूण 1,471 वैद्यकीय पथके तयार करण्यात आली होती. या वैद्यकीय पथकांपैकी 1,400 कार्यरत आहेत, असे ढाका ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे.
Bangladesh: 10 people dead, over 150,000 houses damaged due to cyclone Remal
Read @ANI Story | https://t.co/1cPKaxcz6s#Bangladesh #cyclone #Remal pic.twitter.com/2wGzXI81Yb
— ANI Digital (@ani_digital) May 27, 2024
तसेच बाधित लोकांना 6.85 कोटी रुपयांचे अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. 15 जिल्ह्यांमध्ये 3.85 कोटींच्या खर्चातून 5,500 टन तांदूळ, 5,000 कोरडे अन्न, 1.50 कोटी रुपये बाळांच्या आहारासाठी आणि 1.50 कोटी रुपये चाऱ्यासाठी देण्यात आले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2024 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

