आसाममध्ये पूर आल्यामुळे जवळपास सहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, नागावमध्ये जवळपास 2.88 लाख लोक, कचारमध्ये 1.19 लाख, होजईमध्ये 1.07 लाख, दारंगमध्ये 60562, बिस्वनाथमध्ये 27282 आणि उदलगुरी जिल्ह्यात 19755 लोकांना पुराचा फटका बसला आहे.