Wasim Jaffer Communal Bias Row: वसीम जाफर नव्हे तर उत्तराखंड टीम मॅनेजरने मौलवीला ड्रेसिंग रूममध्ये दिली परवानगी, गोलंदाज Iqbal Abdullah ने केला खुलासा
वसीम जाफर आणि इक्बाल अब्दुल्ला (Photo Credit: Twitter, PTI)

Wasim Jaffer Communal Bias Row: उत्तराखंड क्रिकेट संघाचा (Uttarakhan Cricket Team) मुख्य प्रशिक्षक म्हणून वसीम जाफरच्या राजीनाम्यामुळे (Wasim Jaffer Resignation) माजी भारतीय सलामी फलंदाजावर काही जातीय आरोप करण्यात आले आहे. संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये मौलवीला परवानगी देण्यापासून धर्माच्या आधारावर खेळाडूंना प्राधान्य देण्यापर्यंत जाफरवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आणि आता उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज इक्बाल अब्दुल्लाने (Iqbal Abdullah) मुख्य प्रशिक्षक जाफर नव्हे तर संघ व्यवस्थापकाने मौलवीला त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश दिला असल्याचा दावा केला आहे. “आम्ही मौलवीशिवाय शुक्रवारचे नमाज देऊ शकत नाही. संध्याकाळी 3:40 च्या सुमारास आमची प्रॅक्टिस संपल्यावरच आम्ही नमाज दिली. मी वसीमभाईंना पहिले विचारले की मी मौलवीला प्रार्थनासाठी बोलावू का? त्यांनी मला संघ व्यवस्थापकाची परवानगी घेण्यास सांगितले. मी मॅनेजर नवनीत मिश्रा यांच्याशी बोललो आणि ते म्हणाले, ‘कोई नहीं इकबाल, प्रार्थना-धर्म पहिले. मॅनेजरने मला परवानगी दिली आणि म्हणूनच मी मौलवीला बोलावले,” इकबालने Indian Express ला सांगितले. (Wasim Jaffer यांच्यावर संघ निवडीत मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप; अनिल कुंबळे, इरफान पठाणसह भारतीय क्रिकेटपटूंचा पाठिंबा)

दरम्यान, जाफरने सर्व प्रकारच्या आरोपांपासून स्वत:ला दूर केले आहे, टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये मौलवीची उपस्थितीदेखील बबल-भंग करण्याचा विषय बनला असून व्यवस्थापनाकडून याची चौकशी केली जात आहे. इक्बालने पुढे असाही खुलासा केला की मौलवीला दोनदा ड्रेसिंग रूममध्ये बोलावले होते. जर मॅनेजरने त्याला परवानगी दिली नसती तर इक्बालने तर त्याने मौलवीला बोलावले असते असे इकबालने ठामपणे सांगितले. “जर बायो-बबल असते तर टीम मॅनेजरने मला मौलवीला बोलण्याची परवानगी दिली असती का? मॅनेजरने ‘नाही’ असे म्हटले असते तर मी मौलवीला बोलावले नसते,” तो म्हणाला. पुढे जाफरवरील आरोपांबद्दल अब्दुल्ला म्हणाला की, माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर अशी टीका केली जात असल्यावर त्याने दु:ख व्यक्त केले कारण त्याने कधीही संघात जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला नव्हता.

“वसीम भाई नेहमीच संघाला प्रथम स्थान देतात आणि संघाला कधीही जातीयवादी करण्याचा प्रयत्न केला नाही. क्रिकेटपटू म्हणून असे आरोप कधीही ऐकायला नको असतात. मी वसीम भाईशी बोललो, त्यांना दुःख झाले आहे. हे आरोप खऱ्या मुद्द्यांकडे वळवण्यासाठी केले जात आहेत.” जाफरने खेळाडूंना ‘रामभक्त हनुमान की जय’ नामस्मरण करण्यास सांगितले होते, या आरोपावरून अब्दुल्ला म्हणाले की, संघात बरीच गाणी आहेत आणि जाफरने त्यांना उत्तराखंड असलेल्या एकावर रहायला सांगितले. तीन महिन्यांच्या शिबिरात आमच्याकडे सुमारे 50 घोषणा होत्या. ‘गो उत्तराखंड’ किंवा ‘Let’s play, Uttarakhand’ अशा आम्ही एकाच घोषणेवर टिकून राहिले पाहिजे, असे वसीम भाई म्हणाले. “Let’s play, Uttarakhand’ जरा लांबच असल्याने प्रत्येकाने ‘Go Uttarakhand’ ला चिकटून राहण्याचा निर्णय घेतला,” अब्दुल्ला म्हणाला.