IND vs AUS WTC Final 2023: सुनील गावस्कर रोहित शर्मावर नाराज! कॉमेंट्री करताना काढला राग; प्लेइंग-इलेव्हनमधील मोठी कमतरता सांगितली
अंतिम फेरीत नाणे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बाजूने पडले आणि त्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचेही नाव आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघांमधील स्पर्धा सुरू झाली आहे. अंतिम फेरीत नाणे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बाजूने पडले आणि त्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचेही नाव आहे. कॉमेंट्री करताना त्याने आपला राग काढला. त्यांनी प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी खेळपट्टीच्या बाबतीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले.
अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे मोलाचे योगदान
ते म्हणाले, प्लेइंग-11 मध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज दिसला तो रवींद्र जडेजा. अनुभवी फिरकी मास्टर आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही, तर तो टीम इंडियासाठी दीर्घ फॉरमॅटमध्ये विकेट घेणारा गोलंदाज आहे. संघाला अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे मोलाचे योगदान आहे. अश्विनच्या गैरहजेरीवर सुनील गावसकर यांनी कॉमेंट्रीदरम्यान प्रश्न उपस्थित केला आहे.
अश्विनमुळे आपण इथे आहोत - सुनील गावस्कर
प्रतिक्रिया देताना सुनील गावसकर म्हणाले, 'अश्विन संघात नसल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली आहे. अश्विन या विकेटवर कोणतेही मोठे नुकसान करत नाही. उमेश यादवच्या जागी अश्विनचा संघात समावेश करता आला असता. सुनील गावस्कर यांच्यानंतर हरभजन सिंगनेही त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले. (हे देखील वाचा: Pak Fears Playing In Ahmedabad: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यास घाबरला पाकिस्तान, 'या' राज्यात सामन्यासाठी ठेवली अट)
पहिला दिवसाचा खेळ संपला
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 3 गडी गमावून 327 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ नाबाद 95 आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद 146 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2023 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

