WTC: टीम इंडिया समोर अडचणी वाढल्या, आता 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा हा उरला आहे एकमेव मार्ग

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. 11 कसोटी सामन्यांमध्ये 7 विजय आणि 3 अनिर्णितांसह ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 72.73 इतकी आहे.

WTC: टीम इंडिया समोर अडचणी वाढल्या, आता 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा हा उरला आहे एकमेव मार्ग
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

World Test Championship Table: ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा 164 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर टीम इंडियासाठी अडचणी वाढत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. 11 कसोटी सामन्यांमध्ये 7 विजय आणि 3 अनिर्णितांसह ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 72.73 इतकी आहे. हा संघ पुढील वर्षी कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार बनला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा ऑस्ट्रेलिया खूप पुढे आहे. आफ्रिका सध्या 60 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया

या यादीत दक्षिण आफ्रिकेनंतर श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका सध्या 53.33 च्या विजयाच्या टक्केवारीसह यादीत पहिल्या 5 मध्ये आहे. त्याचबरोबर टीम इंडिया यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी सध्या ५२.०८ आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 51.85 आहे. पाकिस्तानला अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करायचा असेल, तर इथून प्रत्येक सामना जिंकण्याकडे लक्ष द्यावे लागेल. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st ODI 2022: शाकिबने रोहित आणि विराटला एकाच षटकात केले बाद, दुसऱ्यांदा केला हा पराक्रम)

कशी पोहोचल टीम इंडिया फायनलमध्ये?

या टेबलमध्ये टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर असू शकते. पण तरीही त्याच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. येथून भारतीय संघाला त्यांच्या आगामी 6 पैकी 5 सामने जिंकावे लागतील. टीम इंडिया हे करू शकले, तर त्यांचा अंतिम फेरीतील मार्ग मोकळा होणार हे उघड आहे. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाला अजून कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचवेळी, यानंतर ऑस्ट्रेलिया मोठ्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).