IPL 2020 Players Update: हार्दिक पांड्याने आयपीएल 13 पूर्वी RCB कर्णधार विराट कोहलीकडे केली 'ही' खास मागणी, जाणून घ्या
विराट कोहली, हार्दिक पांड्या (Photo Credit: Instagram)

क्रिकेटपटूंना सहसा स्वत:च्या गीअरची काळजी घेण्यास आवडते आणि विराट कोहली (Virat Kohli) याला अपवाद नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार जेव्हा शक्य असेल तेव्हा स्वत:च्या बॅटची दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. कोहलीने नुकतच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात तो संतुलन सुधारण्यासाठी त्याच्या बॅटच्या हँडलचा काही भाग कापताना दिसत आहे. आणि कोहलीच्या फलंदाजीच्या दुरुस्तीच्या कौशल्यामुळे प्रभावित होऊन मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) आपल्याच बॅटसाठी मदतीची विनंती केली. सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirated) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामासाठी खेळाडू जोरदार तयारी करीत आहेत. मुंबईचा पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्सशी होईल, तर आरसीबीचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी 21 सप्टेंबर रोजी होईल. 53-दिवसीय 8 संघीय स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. (IPL 2020 Most Expensive Captain: आयपीएल 13 मध्ये 8 संघांची धुरा सांभाळणार 'हे' खेळाडू, जाणून घ्या कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे)

कोहलीने आपल्या पोस्टवर लिहिले, “हे महत्त्वाचे छोटे तपशील आहेत. बॅटच्या समतोलसाठी माझ्यासाठी हे काही सेंटीमीटर महत्त्वाचे आहेत. मी माझ्या बॅटची काळजी घेतो.” कोहलीच्या या कौशल्याने प्रभावित होऊन लिहिले की, “माझ्या काही बॅट तुला पाठवत आहे.” रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) फ्रँचायझीचे नेतृत्व करणारा विराट नियमितपणे आपल्या चाहत्यांना त्यांच्या प्रशिक्षण दिनक्रमांविषयी अपडेट करत असतो.

माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात हार्दिकने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि अष्टपैलू खेळाडू अद्यापही कोहलीसह भारताच्या मर्यादित ओव्हरच्या सेट अपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. याव्यतिरिक्त, दोन्ही क्रिकेटपटूंचे एकमेकांशी चांगले संबंध आहे आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट याचे पुरावे आहेत. विराट आणि हार्दिक दोघेही यंदाच्या बहुप्रतिक्षित आयपीएल हंगामात आपापल्या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कोहली आरसीबीसाठी पहिले विजेतेपदासाठी नेतृत्व करेल, तर हार्दिक चँपियन मुंबई इंडियन्सकडून त्याच्या अष्टपैलू भूमिकेचे पुनरुत्थान करणे अपेक्षित आहे. आयपीएल 2020 चा हंगाम 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे.