IPL 2020 Final Satta Bazar Predictions: आयपीएल पर्वातील अंतिम सामन्यासाठी सट्टा बजारात तेजी, MI vs DC साठी अधिक बोली लावताना तीव्र स्पर्धा
श्रेयस अय्यर आणि किरोन पोलार्ड (Photo Credit: PTI/Instagram)

IPL 2020 Final Satta Bazar Predictions: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 2020 हंगाम आज संपुष्टात येणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील एक संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) विजेता म्हणून उदयास येईल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स विक्रमी पाचवे विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असतील तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स ज्यांनी पहिल्यांदा आयपीएल फायनल गाठले आहे, ते ऐतिहासिक विजेतेपदाच्या निर्धारित असतील. आजचा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा असली तरी सट्टेबाजांनी त्यांचा अंदाज वर्तविला आहे आणि चांगल्या फरकाने ते एका संघाला स्पष्टपणे पसंती दिली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेत्या संघाचा अंदाज जाणून घेण्यासाठी पाहा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने तीन वेळा दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत असल्याने ते निश्चितपणे विजेतेपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे आणि हे पैज शक्यतांमध्ये देखील दिसून येत आहे. (MI vs DC, IPL 2020 Final Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल फायनल लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

betway.com ने मुंबई इंडियन्सच्या विजयाचा अंदाज 1.66 असा दिला असून दिल्लीसाठी त्यांचा अंदाज 2.20 असा आहे. Bet365 नावाच्या आणखी एका सट्टेबाजी वेबसाइटने आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यासाठी अशीच शक्यता वर्तवली आहे. दिल्ली- मुंबई यांच्यात होणाऱ्या आजच्या फायनल सामन्यात मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे, तर 13 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदा अंतिम सामन्याचे तिकिट मिळवणारे दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच प्रयत्नात विजेता बनण्याची उत्सुकता लागली असेल, त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरले.

दरम्यान, आयपीएल 13 च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सने पहिले स्थान मिळवले असून दिल्लीने दुसरे स्थान मिळवला. दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना झाला ज्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत थेट फायनलमध्ये प्रवेश केला, तर दिल्लीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला आणि पहिल्यांदा फायनल गाठले. आयपीएलमध्ये सर्वाधिक चार विजेतेपद जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे.