मुंबई आणि आसपासच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनच्या पावसामुळे मुंबई शहराच्या पाणीसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात मुख्य जलाशयांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा अवघ्या काही दिवसांत २८ टक्क्यांवरून थेट ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. या दमदार पावसामुळे मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवारी (७ जुलै) रात्रीपासून ते ओसंडून (Overflow) वाहू लागले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या २४ तासांत उपयुक्त पाणीसाठ्यात १२.४४ टक्के, तर गेल्या ४८ तासांत तब्बल २४.४४ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या सातही जलाशयांमध्ये सध्या ५,९८,५८9 दशलक्ष लीटर (ML) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईची एकूण वार्षिक पाणी साठवणूक क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लीटर इतकी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)