KL Rahul: 'मी खूप घाबरलो होतो...' विजयानंतर केएल राहुल नक्की काय म्हणाला? (Watch Video)
केएल राहुल मीडियाशी बोतलाना सामन्याविषयी व्यक्त झाला. तो म्हणाला की 'तो खूप घाबरला होता', पण तो स्वतःला विजयाची खात्री पटवत होता.
Champions Trophy 2025: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियासाठी विजयी शॉट मारणारा केएल राहुल मीडियाशी बोतलाना सामन्याविषयी व्यक्त झाला. तो म्हणाला की 'तो खूप घाबरला होता', पण तो स्वतःला विजयाची खात्री पटवत होता. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडिया तिसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाली आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीने संघाला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवले. केएल राहुल 34 धावा करून नाबाद राहिला. विजयानंतर केएल राहुल म्हणाला की, फलंदाजी करताना तो खूप घाबरलेला होता.
विजयानंतर प्रसारकाशी बोलताना केएल राहुल म्हणाला
'मला खात्री नाही की मी हे ऑन एअर सांगू शकेन की नाही, पण मी खूप घाबरलो होतो (मी स्वतः खूप अस्वस्थ होतो). आपण जिंकू शकतो हे मी स्वतःला पटवून देत होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धावांचा पाठलाग करताना संयम राखणे आणि मला असे करण्यात आनंद होतो. मी पाच पैकी तीन सामन्यांमध्ये अशा वेळी फलंदाजी केली आहे. संघाची खूप प्रतिभा आहे. ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.', असे के एल राहुल म्हणाला.
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2025 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

