T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान आता उपांत्य फेरीसाठी कसे होणार पात्र? येथे जाणून घ्या संपूर्ण समीकरण
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा (IND vs SA) पाच गडी राखून पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानला आता टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणे कठीण जात आहे. मात्र, बाबर आझमचा संघ सुपर 12 च्या गट-2 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही आणि तरीही संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे आवश्यक होते. बांगलादेशच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर सुपर 12 चा गट 2 अधिक रोमांचक झाला आहे. रविवारी सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानच्या विजयानंतर आणि भारताच्या पराभवानंतर, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलसाठी कसे पात्र होऊ शकतात.

भारत कसा पोहचु शकतो उपांत्य फेरीत?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे भवितव्य आता त्याच्या हातात आहे. मात्र, रोहित शर्माचा संघ याला आता हलक्यात घेऊ शकत नाही. भारताला आता सुपर 12 च्या ग्रुप-2 मधील त्यांचे दोन उर्वरित सामने बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला आणि 5 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. भारत दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावप आहे. सुपर 12 च्या गट 2 चे मोठे चित्र असे आहे की ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारताला अव्वल स्थान मिळविण्यासाठी, दक्षिण आफ्रिकेला पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तान किंवा नेदरलँड्सपैकी एकाकडून पराभूत होणे महत्वाचे आहे. (हे देखील वाचा: IND vs SA: अश्विनच्या गोलंदाजीवर मिलर आणि मार्करामने फिरवला सामना, 60 चेंडूत 76 धावांची केली भागीदारी)

पाकिस्तानची काय अवस्था

दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव झाल्याने बाबर आझमच्या संघाची स्थिती बिकट झाली. त्यामुळे पाकिस्तानला आता दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करावे लागेल आणि आता भारताने आपले दोन्ही सामने गमावावेत अशी प्रार्थनाही करावी लागेल. दुसरीकडे नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवले तरी पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. पाकिस्तानला नेट रन रेटचीही काळजी घ्यावी लागेल आणि नेट रन रेटच्या बाबतीत भारताला मागे टाकावे लागेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना पावसात वाहून जावा, अशी प्रार्थनाही त्याला करावी लागेल.