Sunil Gavaskar On Rohit Sharma: ‘रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवा...’ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी सुनील गावस्कर याचं स्पष्ट वक्तव्य; पाहा व्हिडिओ
रोहितच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यापासून टीम इंडियाला विजयापेक्षा पराभवाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला होता. घरच्या मैदानावर एवढ्या मोठ्या कसोटी पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Border-Gavaskar Trophy 2024-25: टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या वनडे आणि टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यापासून टीम इंडियाला विजयापेक्षा पराभवाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला होता. घरच्या मैदानावर एवढ्या मोठ्या कसोटी पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता तो भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर रोहित शर्मावर नाराज होताना दिसला.
'रोहितला कर्णधारपदावरून हटवा'
टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जिथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, रोहित या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: Border-Gavaskar Trophy 2024-25: बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफीनंतर गौतम गंभीरवर टांगती तलवार! न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर बीसीसीआय मोठ्या कारवाईच्या तयारीत)
Sunil Gavaskar (on sports tak) - “If Rohit sharma taking leave from 1st test in BGT, then BCCI should announce a captain for the whole series. Rohit can join whenever he wants but as a player” pic.twitter.com/1vu1SlH44z
— Fearless🦁 (@ViratTheLegend) November 4, 2024
याबाबत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, कर्णधाराने मालिकेतील पहिला सामना खेळणे आवश्यक आहे. दुखापतीमुळे न खेळणे ही वेगळी बाब आहे. मात्र कर्णधार उपलब्ध नसेल तर उपकर्णधारावर खूप दडपण असेल. जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही, तर संपूर्ण मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार म्हणून बदलण्यात यावे आणि रोहितने खेळाडू म्हणून पुनरागमन करावे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 मोठ्या विजयाची गरज
न्यूझीलंडकडून कसोटी मालिका 3-0 ने गमावल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम गुणतालिकेतही मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 4 जिंकायचे आहेत, जी भारतासाठी मोठ्या अडचणीपेक्षा कमी नाही. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात विजय मिळवायचा असेल तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी फॉर्ममध्ये परतणे खूप महत्त्वाचे आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2024 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

