Mumbai Air Pollution: बीसीसीआयचा सुज्ञ निर्णय; हवेची गुणवत्ता खालावल्याने दिल्ली-मुंबईच्या सामन्यादरम्यान टाळणार फटाक्यांची आतषबाजी
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली. वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून उत्तरे मागवली आहे.
- Read in
- मराठी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिल्ली आणि मुंबईत होणाऱ्या विश्वचषक सामन्यांदरम्यान आणि नंतर फटाके न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. जय शहा म्हणाले की, या दोन शहरांमध्ये हवेचे प्रदूषण वाढत आहे. मी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) औपचारिकपणे मांडले आहे. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा निर्णय घेतला आहे. मंडळ पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे.
याआधी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली. वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून उत्तरे मागवली आहे. (हेही वाचा - Shubman Gill and Sara Tendulkar जिओ वर्ल्ड प्लाझा इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्याच्या चर्चा, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)
पाहा पोस्ट -
“BCCI is sensitive to environmental concerns. I took up the matter formally with the ICC and there won’t be any fireworks display in Mumbai, which can add to the pollution level. The Board is committed to combating environmental issues and will always place the interest of our… pic.twitter.com/G0ONkjB5la
— ANI (@ANI) November 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2023 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

