Indian Team Selection: निवडकर्त्यांनी दिले सर्वात मोठे सरप्राईज; Rishabh Pant ला दोन्ही फॉरमॅटमधून वगळले
रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा टी-20 मालिकेसाठी नव्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी 'नवीन' टीम इंडियाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव उपकर्णधार असेल. त्याचवेळी नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे मालिकेत पुनरागमन करेल. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची सुरुवात T20 सामन्याने होणार आहे. पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईत होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा टी-20 मालिकेसाठी नव्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर ऋषभ पंतला दोन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे. बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी पंतचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र सुरुवात होण्यापूर्वीच त्याला रिलीज करण्यात आले. वृत्तानुसार, पंतला गुडघ्याचा त्रास आहे आणि त्याला बेंगळुरू येथील एनसीएकडे रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.
Wicketkeeper Rishabh Pant dropped from India's white ball squads
— Press Trust of India (@PTI_News) December 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2022 11:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

