Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात
भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, पिसे बंधारा येथील दुरूस्ती कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पिसे येथील बांधावरील गेट मध्ये एक रबरी ब्लाडर अचानक बिघाडला आणि पाणीगळती सुरू झाली.दरम्यान आता दुरूस्तीचं काम झाल्यानंतर आता भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
पिसे बंधारा येथील दुरुस्ती कामांमुळे, मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एक दिवसाकरिता संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.#BMCUpdates#SaveWater pic.twitter.com/phOSSVzBC1
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2024 09:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

